शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

आश्रमशाळा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:50 IST

नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. २१ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. २१ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून पदनिहाय पात्रता धारण केलेले कर्मचारी अल्पशा मानधनावर कामकाज करीत आहेत. विशेष बाब म्हणून या कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेशदेखील दिले होते; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून संबंधित विभागातील अधिकाºयांनी भरती आणि बदलीप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाºयांचा प्रश्न मागे पडून सेवेत कायम करण्याचा प्रश्न मागे पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या मार्च महिन्यात रोजंदारी कर्मचाºयांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव, आयुक्त यांच्याबरोबर बैठक झाली होती.यावेळी संघटनेने तीन महिन्यांची मुदत देऊन मागण्या सोडविण्याची विनंती केली होती. यावेळी रोजंदारी कर्मचाºयांना तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्णकरून त्यांना कायम सेवेत सामावून घेतले जाईल असे ठरविण्यातआले होते; मात्र आता या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप रोजंदारी वर्ग-३, वर्ग-४ कर्मचारी संघर्ष संघटनेने केला आहे. याप्रकरणी तत्काळ निर्णय न घेतल्यास दि. २१ पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. चांदवड सोग्रस फाटा येथून पदयात्रा करीत बिºहाड आंदोलन आयुक्तालयावर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.आदिवासी विकास आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर, महेश पाटील, कमलाकर पाटील, संदीप देवरे, सचिन वाघ, रमण ठाकरे, भगतसिंग पाडवी, संजय जाधव, विजय बागुल, राजाराम बागुल आदींच्या स्वाक्षरी आहेत.जानेवारीपासून वेतनापासून वंचितरोजंदारी कर्मचारी जानेवारी २०१८ पासून वेतनापासून वंचित आहेत. यामुळे कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांचे आश्वासन देऊन आता पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रagitationआंदोलन