शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
2
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
3
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
4
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
5
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
6
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
7
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
8
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
9
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
10
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
11
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
12
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
13
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
14
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
15
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
16
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
17
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
18
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
19
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
20
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:50 IST

नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. २१ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. २१ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून पदनिहाय पात्रता धारण केलेले कर्मचारी अल्पशा मानधनावर कामकाज करीत आहेत. विशेष बाब म्हणून या कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेशदेखील दिले होते; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून संबंधित विभागातील अधिकाºयांनी भरती आणि बदलीप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाºयांचा प्रश्न मागे पडून सेवेत कायम करण्याचा प्रश्न मागे पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या मार्च महिन्यात रोजंदारी कर्मचाºयांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव, आयुक्त यांच्याबरोबर बैठक झाली होती.यावेळी संघटनेने तीन महिन्यांची मुदत देऊन मागण्या सोडविण्याची विनंती केली होती. यावेळी रोजंदारी कर्मचाºयांना तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्णकरून त्यांना कायम सेवेत सामावून घेतले जाईल असे ठरविण्यातआले होते; मात्र आता या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप रोजंदारी वर्ग-३, वर्ग-४ कर्मचारी संघर्ष संघटनेने केला आहे. याप्रकरणी तत्काळ निर्णय न घेतल्यास दि. २१ पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. चांदवड सोग्रस फाटा येथून पदयात्रा करीत बिºहाड आंदोलन आयुक्तालयावर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.आदिवासी विकास आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर, महेश पाटील, कमलाकर पाटील, संदीप देवरे, सचिन वाघ, रमण ठाकरे, भगतसिंग पाडवी, संजय जाधव, विजय बागुल, राजाराम बागुल आदींच्या स्वाक्षरी आहेत.जानेवारीपासून वेतनापासून वंचितरोजंदारी कर्मचारी जानेवारी २०१८ पासून वेतनापासून वंचित आहेत. यामुळे कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांचे आश्वासन देऊन आता पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रagitationआंदोलन