शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

सलील कुलकर्णी यांचे गायन रंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:51 IST

‘मोगरा फुलला’, ‘उगीचंच काय भांडायचं’, ‘माझ्या मामाच्या लग्नाला यायचं हं’ आदी सुरेल गीतांच्या सादरीकरणाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, समर्थ बँकेच्या रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशस्थ ऋग्वेद मंगल कार्यालयात सोमवारी (दि.४) आयोजित सलील कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवादाचे.

नाशिक : ‘मोगरा फुलला’, ‘उगीचंच काय भांडायचं’, ‘माझ्या मामाच्या लग्नाला यायचं हं’ आदी सुरेल गीतांच्या सादरीकरणाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, समर्थ बँकेच्या रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशस्थ ऋग्वेद मंगल कार्यालयात सोमवारी (दि.४) आयोजित सलील कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवादाचे. यावेळी सलील कुलकर्णी यांनी विविध सुरेल गीतांसह त्यांच्या दिग्दर्शन, संगीत व गायन प्रवासातील विविध आठवणींना दिलखुलासपणे उजाळा देताना सादर केलेल्या विविध गाण्यांचा रसिकांनी आस्वाद घेतला.प्रारंभी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसह वायुसेनेचे स्क्वॉड्रन लीडर शहीद निनाद मांडवगणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सलील कुलकर्णी यांनी त्यांचा संगीत व चित्रपट प्रवास रसिकांसमोर उलगडून सांगताना ‘माझ्या वेडिंगचा सिनेमा काढा’, ‘मालवून टाक दीप’, ‘आता विसाव्याचे क्षण’, वेगवेगळ्या रचना सादर करताना रसिकांची मने जिंकली. प्रथमेश इनामदार यांनी सलील कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवाद साधला. आदित्य आठल्ये यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक मंदार तगारे यांनी केले. सचिन निरंतर यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर प्रशांत पुरंदरे, मुकुंद कुलकर्णी, प्रीतिश कुलकर्णी यांच्यासह नरेंद्र कुलकर्णी, प्रशांत जुन्नरे, सुहास पाटील, अरुण कुकडे, बाळासाहेब कुलकर्णी, अरुण भांड आदी रसिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक