शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

नगरसूल शाळेचे ६ महिन्यांपासून पगार थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:18 IST

तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांवर गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नाशिक येथील कार्यालय गाठून अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावरदेखील वेळेत कार्यवाही होत नाही. पगारासाठी वेतन कोषागारात उशीर होत असल्याचे कारण सांगितले जात आहे.

येवला : तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांवर गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नाशिक येथील कार्यालय गाठून अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावरदेखील वेळेत कार्यवाही होत नाही. पगारासाठी वेतन कोषागारात उशीर होत असल्याचे कारण सांगितले जात आहे. अखेर त्रस्त झालेल्या शिक्षकांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना निवेदन देऊन आपले गाºहाणे मांडले. याबाबत संबंधितांना कार्यवाही करण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिले. दरम्यान, आॅनलाइन पगाराचा मोठा डांगोरा होऊनदेखील नगरसूल विद्यालयातील पगारापासून वंचित असलेल्या ४५ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांनी वेतनासाठी वेतन अधीक्षक कार्यालयासमोर सहकुटुंबा उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. नगरसूल विद्यालयातील ४५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे माहे फेब्रुवारीपासूनचे पगार नाहीत. वेतनाबाबत धिम्या गतीने कार्यवाही होत आहे. वेतनाचा चेंडू वेतन पथका करून कोषागारात ढकलला जात आहे.त्यामुळे पगार पारित होत नाहीत. या कर्मचाºयांचे गृहकर्ज, वाहन कर्ज हप्ते थकल्याने बँकेच्या नोटिसा आल्या आहेत. विम्याचे हप्ते, थकल्याने पॉलिसी कालबाह्य ठरल्या आहेत. त्यामुळे शिक्षक अधिक चिंतातूर झाले आहेत. शिक्षकांच्या मुलामुलींचे,परगावी शिक्षण चालू आहे. त्यांना महिन्याचा खर्च पाठवणे अवघड झाले आहे. शिवाय कौटुंबिक खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कर्मचाºयांचे मानसिक संतुलन पूर्णत: कोलमडले. त्यामुळे कर्मचाºयांचे शारीरिक व मानिसक संतुलनाची हानी झाली आहे. या प्रश्नांकडे वेतन अधीक्षकांनी गांभीर्याने बघून प्रश्न मार्गी न लावल्याने अखेर आमदार डॉ. तांबे यांना निवेदन देण्यासह उपोषणाचा इशारा या कर्मचाºयांनी दिला आहे. नगरसूलच्या २२ सदस्यीय शिष्टमंडळाने डॉ. सुधीर तांबे, शिक्षण संचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, वेतन अधीक्षक उदय देवरे, गणेश फुलसुंदर यांचेशी चर्चा केली. दोन दिवसात प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन त्यांनी दिले. या चर्चेत शिक्षकेतर संघटना जिल्हा अध्यक्ष रविंद्र जोशी,शिक्षक लोकशाही आघाडीचे नेते मोहन चकोर,मुख्याध्यापक संघाचे सचिव एस,बी.देशमुख,जिभाऊ शिंदे,माणीक मढवई, प्राचार्य सुभाष नागरे,शिक्षक नेते अनिल साळुंके ,राज्य फेडरेशन प्रतिनिधी दत्ता महाले, सविता सौंदणे,शैला गवळी,मंगेश नागपुरे,सुधीर चेमटे, सुमेध कुर्हाडे, ,मंगेश नागपुरे, सुमित कुर्हाडे, संतोष दाभाडे, सुधीर चेमटे, नितीन मोकळ,भीमराज मुंगसे, देविदास देसले, दत्तात्रय बागडे,भगवान तेलोरे,यांनी सहभाग घेतला.६ मिहने पगार का होत नाही. अशी विचारणा डॉ.सुधीर तांबे यांनी संबंधितांना केली.येथील शिक्षकांचे डिसेंबर २०१६,जानेवारी २०१७ चे वेतन जिल्हाबँकेच्या गोंधळामुळे झालेच नाहीत. वेतन पथक आणि शासकीय कोषागार यांच्या चेडूफळीत फेब्रुवारीपासून आजतागायत पगार अडकले आहे.वेतनाविना त्रस्त झालेल्या शिक्षकांचे समाधान न झाल्याने अखेर पगार वेळेत न झाल्यास सहकुटुंब उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला.