शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नगरसूल शाळेचे ६ महिन्यांपासून पगार थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:18 IST

तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांवर गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नाशिक येथील कार्यालय गाठून अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावरदेखील वेळेत कार्यवाही होत नाही. पगारासाठी वेतन कोषागारात उशीर होत असल्याचे कारण सांगितले जात आहे.

येवला : तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांवर गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नाशिक येथील कार्यालय गाठून अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावरदेखील वेळेत कार्यवाही होत नाही. पगारासाठी वेतन कोषागारात उशीर होत असल्याचे कारण सांगितले जात आहे. अखेर त्रस्त झालेल्या शिक्षकांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना निवेदन देऊन आपले गाºहाणे मांडले. याबाबत संबंधितांना कार्यवाही करण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिले. दरम्यान, आॅनलाइन पगाराचा मोठा डांगोरा होऊनदेखील नगरसूल विद्यालयातील पगारापासून वंचित असलेल्या ४५ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांनी वेतनासाठी वेतन अधीक्षक कार्यालयासमोर सहकुटुंबा उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. नगरसूल विद्यालयातील ४५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे माहे फेब्रुवारीपासूनचे पगार नाहीत. वेतनाबाबत धिम्या गतीने कार्यवाही होत आहे. वेतनाचा चेंडू वेतन पथका करून कोषागारात ढकलला जात आहे.त्यामुळे पगार पारित होत नाहीत. या कर्मचाºयांचे गृहकर्ज, वाहन कर्ज हप्ते थकल्याने बँकेच्या नोटिसा आल्या आहेत. विम्याचे हप्ते, थकल्याने पॉलिसी कालबाह्य ठरल्या आहेत. त्यामुळे शिक्षक अधिक चिंतातूर झाले आहेत. शिक्षकांच्या मुलामुलींचे,परगावी शिक्षण चालू आहे. त्यांना महिन्याचा खर्च पाठवणे अवघड झाले आहे. शिवाय कौटुंबिक खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कर्मचाºयांचे मानसिक संतुलन पूर्णत: कोलमडले. त्यामुळे कर्मचाºयांचे शारीरिक व मानिसक संतुलनाची हानी झाली आहे. या प्रश्नांकडे वेतन अधीक्षकांनी गांभीर्याने बघून प्रश्न मार्गी न लावल्याने अखेर आमदार डॉ. तांबे यांना निवेदन देण्यासह उपोषणाचा इशारा या कर्मचाºयांनी दिला आहे. नगरसूलच्या २२ सदस्यीय शिष्टमंडळाने डॉ. सुधीर तांबे, शिक्षण संचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, वेतन अधीक्षक उदय देवरे, गणेश फुलसुंदर यांचेशी चर्चा केली. दोन दिवसात प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन त्यांनी दिले. या चर्चेत शिक्षकेतर संघटना जिल्हा अध्यक्ष रविंद्र जोशी,शिक्षक लोकशाही आघाडीचे नेते मोहन चकोर,मुख्याध्यापक संघाचे सचिव एस,बी.देशमुख,जिभाऊ शिंदे,माणीक मढवई, प्राचार्य सुभाष नागरे,शिक्षक नेते अनिल साळुंके ,राज्य फेडरेशन प्रतिनिधी दत्ता महाले, सविता सौंदणे,शैला गवळी,मंगेश नागपुरे,सुधीर चेमटे, सुमेध कुर्हाडे, ,मंगेश नागपुरे, सुमित कुर्हाडे, संतोष दाभाडे, सुधीर चेमटे, नितीन मोकळ,भीमराज मुंगसे, देविदास देसले, दत्तात्रय बागडे,भगवान तेलोरे,यांनी सहभाग घेतला.६ मिहने पगार का होत नाही. अशी विचारणा डॉ.सुधीर तांबे यांनी संबंधितांना केली.येथील शिक्षकांचे डिसेंबर २०१६,जानेवारी २०१७ चे वेतन जिल्हाबँकेच्या गोंधळामुळे झालेच नाहीत. वेतन पथक आणि शासकीय कोषागार यांच्या चेडूफळीत फेब्रुवारीपासून आजतागायत पगार अडकले आहे.वेतनाविना त्रस्त झालेल्या शिक्षकांचे समाधान न झाल्याने अखेर पगार वेळेत न झाल्यास सहकुटुंब उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला.