शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘सखाराम बाइंडर’ला आठ पारितोषिके

By admin | Updated: January 30, 2015 00:34 IST

कामगार कल्याण नाट्य स्पर्धा : नाशिकचे ‘वा गुरू’ द्वितीय, तर जळगावच्या ‘विठ्ठला’ला तृतीय पारितोषिक

 सातपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने झालेल्या ६२ व्या नाट्य स्पर्धेत देवळाली गाव कामगार केंद्राच्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाने अक्षरश: धूम केली. उत्कृष्ट नाटकासाठीच्या प्रथम पारितोषिकासह ‘सखाराम’ने तब्बल आठ पारितोषिके खिशात टाकली. नाशिकच्या बुधवार पेठ केंद्राच्या ‘वा गुरू’ने द्वितीय, तर जळगावच्या पिंप्राळा केंद्राच्या ‘विठ्ठला’ नाटकाने तृतीय पारितोषिक पटकावले. पहिल्या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक विभागाच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात २ ते २८ जानेवारीदरम्यान सदर स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. स्पर्धेत एकूण अठरा संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवारी येथील कामगार कल्याण भवनात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते विजय साळवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून फरिदा शेख, परीक्षक रवींद्र ढवळे, शुभांगी पाठक, अरुण भावसार, सहायक कल्याण आयुक्त संजय धुमाळ, कामगार कल्याण अधिकारी भावना बच्छाव आदि उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.यावेळी साळवे म्हणाले, नाटक ही एक कला असून, ती आत्मसात करण्यासाठी तिच्या प्रेमात पडायला हवे. या कलेत जीव ओतल्यास नाटकाचा दर्जा उंचावतो. नाटक सादर करताना इतरांऐवजी स्वत:शीच स्पर्धा करावी. नाटक समाजाला जागृत करते आणि माणसाला आणखी माणूसपणाच्या जवळ नेते. परीक्षकांच्या वतीने ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले. महेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केले. भानुदास जाधव यांनी आभार मानले.