शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

संत साहित्य, अध्यात्माचा अभ्यासक हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:39 IST

आपल्या प्रवचनांमधून नेहमीच अध्यात्मा विषयीची दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे, अध्यात्माचे गाढे अभ्यासक व संत साहित्यावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती समाजाने यशवंत पाठक यांच्या रूपाने गमाविल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.

नाशिक : आपल्या प्रवचनांमधून नेहमीच अध्यात्मा विषयीची दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे, अध्यात्माचे गाढे अभ्यासक व संत साहित्यावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती समाजाने यशवंत पाठक यांच्या रूपाने गमाविल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.सावानाच्या वा. गो. कुलकर्णी कलादालनात बुधवारी (दि.२७) यशवंत पाठक यांची श्रद्धांजली सभा झाली. यावेळी त्यांचे बंधू कवी किशोर पाठक, सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते उपस्थित होते. अध्यात्म आणि संतसाहित्य हे पाठक यांचे जीव की प्राण होते. संत साहित्याला दिशा देण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. तसेच लोकांना अध्यात्माचे महत्त्व समजावे, यासाठी विविध व्याख्यानांमधून मार्गदर्शन केले, अशा भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त झाल्या.माझ्या आत्मचरित्रात त्यांच्या अनेक आठवणी मांडल्या आहेत. त्यांचे बोलणे रसाळ-मधुर होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे संतसाहित्य पोरके झाले आहे, असे डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी यावेळी सांगितले. अध्यात्माची बाजू त्यांनी अत्यंत दमदारपणे मांडल्याचे पुरुषोत्तम सावंत यांनी सांगितले. पाठक यांच्यासोबत खूप काम केले. आम्ही एमएपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. अनेक विषयांवर आमच्या गप्पा व्हायच्या. त्यांच्याशी संवाद म्हणजे एक मेजवानीच असायची. त्यांच्या जाण्याने संत साहित्याची हानी झाल्याची भावना श्रीकृष्ण सिन्नरकर यांनी व्यक्त केली. शलाका सावंत, प्राचार्य वेदश्री थिगळे, रमेश कडलग, सुभाष सबनीस, माधवराव भणगे, विठ्ठल देशपांडे, चंद्रकांत खासे, अ‍ॅड. भानुदास शौचे, जयप्रकाश जातेगावकर, डॉ. उल्हास रत्नपारखी यांनीही श्रद्धांजली वाहिली. प्रा. डॉ. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Nashikनाशिक