शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

सामाजिक एकतेसाठी संतांचे योगदान : टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:51 AM

महाराष्ट्रात वारकरी, नाथ, महानुभाव, श्री दत्त, गणेश, देवी असे वेगवेगळे संप्रदाय असून त्यातील संतांची थोर परंपरा आहे़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत संतांचे योगदान मोठे असून, समाजाच्या हितासाठी प्रसंगी त्यांनी बंडखोरीही केली़

नाशिक : महाराष्ट्रात वारकरी, नाथ, महानुभाव, श्री दत्त, गणेश, देवी असे वेगवेगळे संप्रदाय असून त्यातील संतांची थोर परंपरा आहे़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत संतांचे योगदान मोठे असून, समाजाच्या हितासाठी प्रसंगी त्यांनी बंडखोरीही केली़ संतांचे विचार व आचार यामुळेच सामाजिक एकता टिकून राहिल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांनी व्यक्त केले. गंगापूर रोडवरील शंकराचार्य सभागृहात प्रमिला मिरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित २४व्या मिरजकर स्मृती सोहळ्यात ‘संतांची बंडखोरी’ या विषयावर ते बोलत होते़टिळक पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील संतांनी कधीही मी असा भाव न धरल्याने ते मोठे कार्य करू शकले़ समाजातील अनेक क्षेत्रांमधील आजही संतांसारखी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असल्याने या क्षेत्राचा व संस्थांचा विकास होतो आहे़ समाजाचे संस्थांकरण हे महत्त्वाचे कार्य प्रारंभी संतांनीच केले़ धर्म, वंश जात यामध्ये भेदभाव केला जाऊ नये यासाठी संत आणि संस्था यांचे कार्य मोलाचे होते़ राज्यातील अनेक चळवळी या संतांशी निगडित असून समतेची चळवळ ही महात्मा फुले यांच्याशी तर प्रार्थना समाज ही न्या. रानडे यांची चळवळ भागवत परंपरेशी तर शाहू महाराजांच्या चळवळीचा प्रवास पुन्हा समतेकडे जातो़  महाराष्ट्राच्या विकासासाठी आजही या चळवळींचे कार्य आवश्यक असल्याचे टिळक यांनी सांगितले. यावेळी अभय टिळक व मान्यवरांच्या हस्ते कॉलेजरोडवर गत ३०-३५ वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणारे फॅमिली डॉक्टर डॉ. मोहन टेंबे, त्र्यंबकेश्वर येथील वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबक (बाळासाहेब) भास्कर दीक्षित शास्त्री व ज्येष्ठ विधीज्ज्ञ सुहास मिसर यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.रुग्णाचे शरीर व मनाचे फॅमिली डॉक्टरला ज्ञानरुग्णाचे केवळ शरीरच नव्हे तर मनाचाही ठाव ज्या डॉक्टरांना कळतो तेच खरे फॅमिली डॉक्टर होय अशी व्याख्या टिळक यांनी सांगितली़ अद्ययावत तंत्रज्ञानाच्या या युगात प्रामाणिक, निष्ठावान डॉक्टर आहेत़ मात्र, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संवाद हरवत चालला असून हा संवाद वाढविण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे टिळक म्हणाले़

टॅग्स :Nashikनाशिक