नाशिक : सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या नवव्या त्रैवार्षिक दोनदिवसीय अधिवेशनाला येत्या शनिवारपासून (दि.३१) शहरात प्रारंभ होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकासाच्या माध्यमातून देशाची आर्थिक प्रगती साधण्याच्या उद्दिष्टाने सहकार भारती देशभर कार्यरत आहे. आर्थिक दृष्टीने कमकुवत वर्गाच्या आर्थिक समस्यांचे निदान व समाधान करून सहकारी संस्थांची स्थापना करणे व त्यासाठी राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्याविषयी समाजामध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सहकार भारतीचे कार्य सुरू असल्याचे बिर्ला यांनी यावेळी सांगितले. आगामी त्रैवार्षिक अधिवेशनात ग्रामीण भागात सक्षमपणे कार्य करणार्या संस्था, पतसंस्थांच्या संचालकांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे यांनी दिली. ग्रामीण भागात बॅँकिंगच्या सोयीसुविधा पुरवून तळागाळातील शेतकर्यांना अर्थसहाय्य करण्याचे काम सहकार भारतीप्रणीत संस्था करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रविवारी (दि.१ जून) रोेजी अधिवेशनाचा समारोप होणार आहे.
सहकार भारतीचे त्रैवार्षिक अधिवेशन
By admin | Updated: May 29, 2014 01:12 IST