शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सहाब, हमारे बच्चे हमें लौटा दिजीयें; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना बिहारच्या 'त्या' मुलांच्या पालकांचे साकडे

By अझहर शेख | Updated: June 12, 2023 15:06 IST

नाशिक : बिहारमधून सांगलीच्या निवासी मदरशात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या ५९ अल्पवयीन मुलांना धावत्या रेल्वेतून रेल्वे पोलिसांनी भुसावळ व ...

नाशिक : बिहारमधून सांगलीच्या निवासी मदरशात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या ५९ अल्पवयीन मुलांना धावत्या रेल्वेतून रेल्वे पोलिसांनी भुसावळ व मनमाडमध्ये रेस्क्यू केले होते. या मुलांच्या पालका मागील दहा दिवसांपासून नाशिकमध्ये त्यांच्या मुलांना घेण्यासाठी आले आहेत; मात्र सरकारी यंंत्रणांकडून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर सोमवारी (दि१२) या गोरगरीब पालकांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., यांची भेट घेतली. ‘सहाब, हमारे बच्चे हमें वापस लौटा दिजीयें...’ असे साकडे त्यांना घातले.

मानवी तस्करीच्या संशयातून रेल्वे पोलिसांनी भुसावळ व मनमाड या दोन रेल्वे स्थानकावर मागील आठवड्यात कारवाई केली होती. या मुलांना बिहारमधून सांगलीला घेऊन जाणाऱ्या दोन मौलनांनांही अटक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर या सर्व मुलांना नाशिक व भुसावळच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहेत. या मुलांच्या आई-वडिलांपर्यंत जेव्हा ही बातमी माध्यमांद्वारे पोहचली, तेव्हा त्यांनी थेट रेल्वेतून भुसावळ व मनमाड गाठले. मागील दहा दिवसांपासून सुमारे दहा ते बारा बिहारचे नागरिक नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. बिहारच्या रेल्वे स्थानकाद्वारे त्या सर्व मुलांचे आरक्षण तिकिटदेखील आहेत, असे पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

दरम्यान, आमदार हिरामण खोसकर, हिंद मुस्लीम हक सुरक्षा व विकास महासमितीचे अंजुम मकरानी, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांच्यासह मुलांच्य पालकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची भेट घेतली. सर्व ५९ मुलांना तातडीने त्यांच्या पालकांकडे सोपवावेत अशी मागणी केली. या मुलांचा कुठलाही दोष नाही, किंवा ते गुन्हेगारही नाही, मग त्यांना अन्यायकारक वागणूक का दिली जात आहे? असा सवालही उपस्थित केला. दुसऱ्यांदा या शिष्टमंडळाकडून त्यांना निवेदन देण्यात आले.