शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

साधू-महंतांची मनधरणी

By admin | Updated: July 20, 2014 01:45 IST

साधू-महंतांची मनधरणी

 

नाशिक : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात व नियोजनात साधू-महंतांना कोठेही विश्वासात घेतले गेले नसल्याची तक्रार विविध आखाड्यांच्या प्रमुखांनी करण्यास सुरुवात केल्याने खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने अखेर महिना अखेरीस बैठक घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी देशभरातील प्रमुख साधू-महंतांना पाचारण करण्यात येणार आहे. आखाडा परिषदेच्या जवळपास सर्वच महंतांनी जिल्हा प्रशासनावर कुंभमेळ्याच्या प्रश्नावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. वर्षावर कुंभमेळा आलेला असताना अद्यापही प्रशासनाने साधू-महंतांना त्यांच्या गरजा व निकड विचारलेली नाही. त्याचबरोबर साधुग्रामसाठी जागा, आखाडे, खालशांना निवारा शेड, पाणीपुरवठा, आरोग्याची सोय, वीज आदिंबाबतीत काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून कुंभमेळ्याबाबत प्रशासन उदासीन असल्याची भावना निर्माण झाली आहे. प्रशासन विकासकामांबाबतही विश्वासात घेत नसल्याचे पाहून प्रसंगी कुंभमेळ्यावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा महंतांनी दिल्यामुळे आता प्रशासनाने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वीच महंत ग्यानदासजी यांच्याशी स्वत: जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी भ्रमणध्वनी-वरून संपर्क साधून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यावर सर्व साधू-महंतांना एकत्र बोलावून बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. येत्या ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात येणार असून, त्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित आखाड्यांच्या देशभरातील प्रमुखांना पत्र पाठवून बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत साधू-महंतांच्या अपेक्षा जाणून घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)