शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

धावपटू कविता राऊतला भाजपकडून सबुरीचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 01:15 IST

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी सेनेत प्रवेश करीत आपला मतदारसंघ निश्चित केल्यानंतर त्यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी कॉँग्रेसने धावपटू कविता राऊतची मनधरणी करीत कॉँग्रेसकडून लढण्याबाबतची गळ घातली होती.

नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी सेनेत प्रवेश करीत आपला मतदारसंघ निश्चित केल्यानंतर त्यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी कॉँग्रेसने धावपटू कविता राऊतची मनधरणी करीत कॉँग्रेसकडून लढण्याबाबतची गळ घातली होती. मात्र राजकीय प्रवेशाबाबत आपला कोणताही निर्णय झाला नसल्याचे वारंवार सांगणाऱ्या कविता राऊत हिने मुंबईत काही भाजप नेत्यांची भेट घेतल्याने कविताच्याही राजकीय आशा पल्लवित झाल्याचे मानले जाते आहे. विशेष म्हणजे भाजपकडून कोणताही शब्द मिळाला नाहीच उलट तिला सबुरीचा सल्ला देण्यात आला असल्याचे वृत्त आहे. स्थानिक भाजप नेते मात्र कविताच्या नावाचे राजकीय भांडवल करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार-संघातून सलग दोनदा आमदार झालेल्या निर्मला गावित यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेच्या बळावर हॅट््ट्रिकची तयारी चालविली आहे. मतदारसंघ कॉँग्रेसला अनुकूल असतानाही गावित यांनी सेनाप्रवेश केल्याने मतदारसंघातील तसेच तालुक्यातील कॉँग्रेस नेत्यांनी कार्यकर्ते मात्र कॉँग्रेसमध्येच असल्याचे सांगून गावित यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी धावपटू कविता राऊत हिच्याशी प्राथमिक चर्चा करून काँग्रेसकडून लढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. कॉँग्रेसच्या सुरगाणा येथील एका कार्यक्रमासाठीदेखील कविताला आमंत्रण देण्यात आले होेते. कविताने काँग्रेस नेत्यांना कोणताही शब्द दिला नाही, मात्र कविताला बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त करून निवडणूक लढण्यास उत्सुक नसल्याचे दाखवून दिले होते. कविताच्या या भूमिकेमुळे कॉँग्रेस नेते बॅकफूटवर गेले असतानाच काही दिवसांपूर्वीच कविता राऊत मुंबईत भाजपाचे नेते आशिष शेलार यांना भेटल्याचे वृत्त आहे. एकीकडे निवडणूक लढविण्याविषयी उत्सुकता नसल्याचे सांगितले जात असतानाच दुसरीकडे भाजपचा दरवाजा ठोठावल्यामुळे कविताच्या राजकीय आकांक्षा पल्लवित झाल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे. भाजपकडून कोणतेही बोलावणे आलेले नसतानाही भाजप नेत्यांची त्यांनी स्वत: घेतलेली भेट सध्या चांगलीच चर्चेत आहे.असून, भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडूनच याबाबतची माहिती अधिकाधिक पसरविली जात आहे. भाजपा नेते शेलार यांच्याशी झालेल्या चर्चेत कविता राऊत हिला कोणताही शब्द मिळाला नसून उलट सबुरीचा सल्ला देण्यात आल्याचे समजते.कॉँग्रेसमध्ये न जाण्याचा सल्ला?कॉँग्रेसकडून कविता राऊतला निवडणुकीसाठी विचारण्यात आल्यानंतर कविताला बिनविरोध निवडून देण्याबाबतचा प्रस्ताव तिच्या कुटुंबीयांनी काँग्रेसपुढे ठेवला होता. त्यानंतर भाजपने त्यांना भेटून पुन्हा याच मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी भाजप नेत्यांनी निवडणुकीत विरोधात कुणीतरी उभे राहतच असते, असे सांगून कोणताही शब्द दिला नाही, मात्र काँग्रेसमध्ये न जाण्याचा सल्ला दिल्याचे समजते.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा