शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘साँवरीया, काहे मोरा कटोरा खाली

By admin | Updated: November 12, 2014 23:33 IST

‘साँवरीया, काहे मोरा कटोरा खाली

’हेमंत कुलकर्णी ल्ल नाशिकना माँगे ये सोना चाँदीमाँगे दर्शन देवीतेरे द्वार खडा एक जोगीहेमंतकुमार यांच्या दर्दभऱ्या आवाजातल्या या लोकप्रिय गाण्याचा खडबडीत अनुवाद करायचा झाला तर,नाही मागत डीसीएमना मागत मलईदार खातीफक्त दे दर्शन सत्तादेवीद्वारी उभा तुझ्या एक फकीर जोगीअसाच काहीसा होईल नाही?महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री आणि सेनाप्रमुखांचे परमस्नेही ‘जनाब’ अंतुले त्यांच्या भाषणांमधून बऱ्याचदा असे म्हणत, ‘तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे पलू लागलात की ती तुमच्यापासून दूर पलते आणि तुम्हीत तिच्यापासून पलू लागलात की ती तुमच्या मागे पलत येते’. असेलही हे खरे. पण असेल कशाला, आहेत आणि त्याचा प्रत्यय अन्य कोणाला येण्यापेक्षा थेट सेनाप्रमुखांच्या चिरंजीवांनाच यावा, हा किती अपूर्व योगायोग बरे!मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनच्या बाहेर बऱ्याचदा एखाद्या उपयोगी वस्तुचा डोंगर लावून विक्रेता त्याची विक्री करीत असतो. एक खट गिऱ्हाईक येतं. विक्रेता सांगतो त्या किंमतीच्या एकदम दहा टक्के किंमतीचा देकार देतो. आधी विक्रेता तयार होत नाही. खूप घासाघीस होते. अखेर विक्रेता तयार होतो, ‘जाव लेके जाव, तुम भी क्या याद करोगे’ असे म्हणतो. पण गिऱ्हाईक तोंड फिरवून निघून जातं, काहीही न घेता. मग काय नुसतीच चडफड आणि चिडचिड. आता यात कोण सेना आणि कोण भाजपा, हे ज्याचं त्यानं ठरवावं!खरं तर बार्गेनींगलाही काही मर्यादा असतात. पण या मर्यादांचाही कडेलोट झाला. त्यासाठी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मार्क द्यावेत तितके थोडेच. ताठरपणा ते अति सैलपणा हा निकालोत्तर प्रवास मतदानपूर्व काळात झाला असता तर? असं भाजपावाले उर्फ चड्डीवाले, उर्फ शास्ताखानाची फौजवाले भले म्हणोत पण महाराष्ट्राचं आणि मराठी माणसांच भलं करण्याचं कांकण त्यांनी थोडंच हाती चढवलं आहे. आणि होऊ शकते कधी कधी ‘एरर आॅफ जजमेन्ट’ पण म्हणून का पंचवीस वर्षे सहन केलेला सूनवास असा एकाएकी का सासुरवासात तबदील करायचा? सासुरवास म्हटलं की सासूचं खाष्टपण ओघानंच आलं. परिणाम एकच, सुनेचं मीठ अळणी. किती वेगवेगळ्या पद्धतीनं आळवून बघितलं. ‘आता आम्ही नाही, तर तुम्ही मोठे बंधू’?. चालेल! तुम्ही सांगाचं आणि आम्ही ऐकाचं. तुम्ही द्याल ते निमूट स्वीकारु. पण काही बोलाल तर खरं. पण कुणी काही बोलायलाच तयार नाही. आता बोलतील, मग बोलतील या आशेवर आपणहूनच सत्तासोपानाची एकेक पायरी उतरायला सुरुवात केली. समोरचे जणू सुचवत होते, तोडायचं ना, मग आत्ताच तोडा, कालापव्यय नको! पण त्यांना सांगायला काय जातंय? परप्रांतीयांपासून मुंबईसह अखंड महाराष्ट्र वाचवायचाय, यवनांपासून देश वाचवायचाय, अखंड हिन्दुस्थान आधी निर्माण करुन नंतर तो काँग्रेसमुक्तही करायचाय. हे शिवधनुष्य उचलणं म्हणजे चिन्हातील धनुष्यबाण वा रंगमंचावरुन उंचावलेल्या हातात गदा वा तलवार उचलण्याइतकं का सोपं आहे? एकाच्या जोडीला दुसरा असलेला केव्हांही चांगला. ‘मोअर द मेरिअर’ पण कशा-कशाचा म्हणून काहीही परिणाम नाही. शेवटच्या दिवसापर्यंत कसलं, शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघितली. ज्याची कधी ओळखदेखील झाली नव्हती, त्या संयमाचा मन:पूत वापर केला. पण अखेर शेवटी काय झालं?हाय रे जालीमतेरे दरपे खाली हाथ आये थेखालीही हाथ लौट चलें