शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘साँवरीया, काहे मोरा कटोरा खाली

By admin | Updated: November 12, 2014 23:33 IST

‘साँवरीया, काहे मोरा कटोरा खाली

’हेमंत कुलकर्णी ल्ल नाशिकना माँगे ये सोना चाँदीमाँगे दर्शन देवीतेरे द्वार खडा एक जोगीहेमंतकुमार यांच्या दर्दभऱ्या आवाजातल्या या लोकप्रिय गाण्याचा खडबडीत अनुवाद करायचा झाला तर,नाही मागत डीसीएमना मागत मलईदार खातीफक्त दे दर्शन सत्तादेवीद्वारी उभा तुझ्या एक फकीर जोगीअसाच काहीसा होईल नाही?महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री आणि सेनाप्रमुखांचे परमस्नेही ‘जनाब’ अंतुले त्यांच्या भाषणांमधून बऱ्याचदा असे म्हणत, ‘तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे पलू लागलात की ती तुमच्यापासून दूर पलते आणि तुम्हीत तिच्यापासून पलू लागलात की ती तुमच्या मागे पलत येते’. असेलही हे खरे. पण असेल कशाला, आहेत आणि त्याचा प्रत्यय अन्य कोणाला येण्यापेक्षा थेट सेनाप्रमुखांच्या चिरंजीवांनाच यावा, हा किती अपूर्व योगायोग बरे!मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनच्या बाहेर बऱ्याचदा एखाद्या उपयोगी वस्तुचा डोंगर लावून विक्रेता त्याची विक्री करीत असतो. एक खट गिऱ्हाईक येतं. विक्रेता सांगतो त्या किंमतीच्या एकदम दहा टक्के किंमतीचा देकार देतो. आधी विक्रेता तयार होत नाही. खूप घासाघीस होते. अखेर विक्रेता तयार होतो, ‘जाव लेके जाव, तुम भी क्या याद करोगे’ असे म्हणतो. पण गिऱ्हाईक तोंड फिरवून निघून जातं, काहीही न घेता. मग काय नुसतीच चडफड आणि चिडचिड. आता यात कोण सेना आणि कोण भाजपा, हे ज्याचं त्यानं ठरवावं!खरं तर बार्गेनींगलाही काही मर्यादा असतात. पण या मर्यादांचाही कडेलोट झाला. त्यासाठी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मार्क द्यावेत तितके थोडेच. ताठरपणा ते अति सैलपणा हा निकालोत्तर प्रवास मतदानपूर्व काळात झाला असता तर? असं भाजपावाले उर्फ चड्डीवाले, उर्फ शास्ताखानाची फौजवाले भले म्हणोत पण महाराष्ट्राचं आणि मराठी माणसांच भलं करण्याचं कांकण त्यांनी थोडंच हाती चढवलं आहे. आणि होऊ शकते कधी कधी ‘एरर आॅफ जजमेन्ट’ पण म्हणून का पंचवीस वर्षे सहन केलेला सूनवास असा एकाएकी का सासुरवासात तबदील करायचा? सासुरवास म्हटलं की सासूचं खाष्टपण ओघानंच आलं. परिणाम एकच, सुनेचं मीठ अळणी. किती वेगवेगळ्या पद्धतीनं आळवून बघितलं. ‘आता आम्ही नाही, तर तुम्ही मोठे बंधू’?. चालेल! तुम्ही सांगाचं आणि आम्ही ऐकाचं. तुम्ही द्याल ते निमूट स्वीकारु. पण काही बोलाल तर खरं. पण कुणी काही बोलायलाच तयार नाही. आता बोलतील, मग बोलतील या आशेवर आपणहूनच सत्तासोपानाची एकेक पायरी उतरायला सुरुवात केली. समोरचे जणू सुचवत होते, तोडायचं ना, मग आत्ताच तोडा, कालापव्यय नको! पण त्यांना सांगायला काय जातंय? परप्रांतीयांपासून मुंबईसह अखंड महाराष्ट्र वाचवायचाय, यवनांपासून देश वाचवायचाय, अखंड हिन्दुस्थान आधी निर्माण करुन नंतर तो काँग्रेसमुक्तही करायचाय. हे शिवधनुष्य उचलणं म्हणजे चिन्हातील धनुष्यबाण वा रंगमंचावरुन उंचावलेल्या हातात गदा वा तलवार उचलण्याइतकं का सोपं आहे? एकाच्या जोडीला दुसरा असलेला केव्हांही चांगला. ‘मोअर द मेरिअर’ पण कशा-कशाचा म्हणून काहीही परिणाम नाही. शेवटच्या दिवसापर्यंत कसलं, शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघितली. ज्याची कधी ओळखदेखील झाली नव्हती, त्या संयमाचा मन:पूत वापर केला. पण अखेर शेवटी काय झालं?हाय रे जालीमतेरे दरपे खाली हाथ आये थेखालीही हाथ लौट चलें