शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:34 IST

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत आहे.

ठळक मुद्देसिन्नर: २२ ग्रामसेवक सहायक निवडणूक अधिकारी

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत आहे.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहायक निवडणूक अधिकारी असलेल्या २२ ग्रामसेवकांच्या ४२ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी दाखले लागत आहेत. त्यांचीही अडचण निर्माण झाली आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका सिन्नर तालुक्यात होत आहेत. ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांना दाखले देणे, घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करांच्या पावत्या वितरित करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये थांबावे की, अर्ज स्वीकारण्यासाठीची जबाबदारी पार पाडावी, असा पेच संबंधित ग्रामसेवकांसमोर निर्माण झाला आहे.                          अर्ज दाखल करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्याने आधीच पॅनलचे स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार व त्यांच्या पाठिराख्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. ग्रामसेवक संघटनेने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पर्यायी कर्मचा-यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. कारण निवडणूक कार्यक्रम २१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

                     इच्छुक उमेदवारांना चार-पाच दिवसात दाखले देणे व त्यानंतर या गावांतील अन्य नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणे, त्यांनाही आवश्यक दाखले देणे अशी कामेही होऊ शकतील. याबाबतीत तहसीलदार काय निर्णय घेतात, याकडे ग्रामसेवकांचे लक्ष लागलेले आहे. नागरिकांचे हित लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायतींवर पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून द्यावा या मागणीने जोर धरला आहे.शासनाने घ्यावी दखलनिवडणूक विभागाने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पर्यायी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यास नागरिकांची अडचण होणार नाही. इच्छुक उमेदवारांची गैरसोय होणार नाही आणि त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची धावपळ थांबेल, अशी आमची भूमिका असल्याचे ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित गावांमध्येही निवडणुका असल्या तरी अन्य नागरिकांनादेखील विविध कामांसाठी दाखले, उतारे लागत असतात. त्यांची प्रशासनाने दखल घ्यावी आणि निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक