शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:34 IST

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत आहे.

ठळक मुद्देसिन्नर: २२ ग्रामसेवक सहायक निवडणूक अधिकारी

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत आहे.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहायक निवडणूक अधिकारी असलेल्या २२ ग्रामसेवकांच्या ४२ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी दाखले लागत आहेत. त्यांचीही अडचण निर्माण झाली आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका सिन्नर तालुक्यात होत आहेत. ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांना दाखले देणे, घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करांच्या पावत्या वितरित करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये थांबावे की, अर्ज स्वीकारण्यासाठीची जबाबदारी पार पाडावी, असा पेच संबंधित ग्रामसेवकांसमोर निर्माण झाला आहे.                          अर्ज दाखल करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्याने आधीच पॅनलचे स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार व त्यांच्या पाठिराख्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. ग्रामसेवक संघटनेने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पर्यायी कर्मचा-यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. कारण निवडणूक कार्यक्रम २१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

                     इच्छुक उमेदवारांना चार-पाच दिवसात दाखले देणे व त्यानंतर या गावांतील अन्य नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणे, त्यांनाही आवश्यक दाखले देणे अशी कामेही होऊ शकतील. याबाबतीत तहसीलदार काय निर्णय घेतात, याकडे ग्रामसेवकांचे लक्ष लागलेले आहे. नागरिकांचे हित लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायतींवर पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून द्यावा या मागणीने जोर धरला आहे.शासनाने घ्यावी दखलनिवडणूक विभागाने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पर्यायी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यास नागरिकांची अडचण होणार नाही. इच्छुक उमेदवारांची गैरसोय होणार नाही आणि त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची धावपळ थांबेल, अशी आमची भूमिका असल्याचे ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित गावांमध्येही निवडणुका असल्या तरी अन्य नागरिकांनादेखील विविध कामांसाठी दाखले, उतारे लागत असतात. त्यांची प्रशासनाने दखल घ्यावी आणि निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक