शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

ग्रामीण आरोग्य व्यवस्था रूग्णशय्येवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 21:37 IST

गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याचा कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारीपदी वर्णी लावण्यासाठी होत असलेली लॉबींग व चढाओढ पाहता, रूग्णसेवा करण्याची खरोखरच किती उमाळा या मंडळींमध्ये

श्याम बागुलजिल्ह्याच्या ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या आरोग्य कर्मचा-यांच्या पदस्थापनेचा त्याग करणे आणि जिल्हा आरोग्य अधिका-याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या तक्रारीवरून पदावरून शासनाने निलंबीत करण्याचा प्रकार पाहता, जिल्ह्याच्या आरोग्याची व्यवस्था पाहणा-या यंत्रणेच्याच आरोग्याची तपासणी करण्याची वेळ आल्याचे जाणवू लागले आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या एकूणच वर्तनाविषयी असलेल्या तक्रारी पाहता त्यांच्याकडून खरोखरच रूग्णसेवा घडत असेल असे वाटण्याऐवजी त्यांच्यातील अंतर्गत गटबाजी, राजकारणाचा झालेला शिरकाव व कर्तव्याविषयीची उदासिनता पाहता आरोग्य खात्याचे अनारोग्य बिघडले असे म्हणावे लागेल.

गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याचा कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारीपदी वर्णी लावण्यासाठी होत असलेली लॉबींग व चढाओढ पाहता, रूग्णसेवा करण्याची खरोखरच किती उमाळा या मंडळींमध्ये आहे हे नंतरच्या काळात होणाºया तक्रारींवरून निदर्शनास आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारीपदी रूजू झालेले डॉ. विजय डेकाटे यांच्या कारभाराविषयी नाशिक महापालिकेत झालेल्या तक्रारी व आरोग्य विभागाची झालेली दुरावस्था ताजी असतानाच त्याची शिक्षा म्हणून डेकाटे यांच्याकडे थेट ग्रामीण जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारीच सोपविण्यात आली. त्यामुळे दुखावलेल्या काही मंडळींनी किंबहुना जिल्हा आरोग्य अधिकारीपदी कायम राहू इच्छिणा-यांनी डेकाटे यांच्या विरोधात मोहीम न उघडली तर नवलच. अशाच प्रकरणातून डेकाटे यांच्या विरोधात त्यांच्याच हाताखालच्या वैद्यकीय अधिका-याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करावी त्यावरून गुन्हा दाखल होवून डेकाटे यांना निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. याचाच अर्थ आरोग्य विभागात जे काही चालू आहे ते योग्य नाही असेच वाटते. आता या पदाचा अतिरीक्त पदभार देण्यात आला असला तरी, जिल्ह्यातील आरोग्याची परिस्थिीत पाहता, मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुका पातळीवर काम करणा- वैद्यकीय अधिका-यांनी आरोग्य कर्मचा-यांची पदस्थापना सोडण्याचा घेतलेला निर्णय देखील काहीसा कटू असला तरी, त्यामागेही अर्थकारणाचाच वास येवू लागला आहे. आरोग्य विभागाला दरवर्षी मिळणारे लाखो रूपये खर्चात होत असलेले गैरप्रकारच त्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद