शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ग्रामसभेच्या सक्तीने ग्रामविकास यंत्रणा बुचकळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 19:40 IST

नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना आरोग्य विभागाकडून केल्या जात असून, शासनाच्या आदेशानुसार नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी, शाळा, महाविद्यालयांना सुटी,

ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव : गर्दी टाळावी की करावी?सभा, समारंभांनाही परवानगी नाकारण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र चिंतेचे सावट असून, नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी टाळण्याबरोबरच स्वच्छतेविषयक खबरदारी घेण्याचे आवाहन एकीकडे केले जात असताना दुसरीकडे मात्र ग्राम विकास विभागाने सर्व जिल्हा परिषदा व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून कोरोनापासून बचावासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना व खबरदारीची माहिती देण्यासाठी गावोगावी ग्रामसभा घेण्याची सक्ती केली आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असताना ग्रामसभेसाठी ग्रामस्थ एकत्र आल्यास कायद्याचे उल्लंघन होणार असल्याने ग्रामविकास विभागाच्या या पत्रामुळे यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना आरोग्य विभागाकडून केल्या जात असून, शासनाच्या आदेशानुसार नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी, शाळा, महाविद्यालयांना सुटी, मंदिरे, महाआरती बंद करण्यात आली आहे. सभा, समारंभांनाही परवानगी नाकारण्यात आली असून, आठवडे बाजार, यात्रा, धार्मिक उत्सव स्थगित करून नागरिकांना अधिकाधिक खबरदारी घेण्यासाठी जनजागृती केली जात आहे. परिणामी नागरिकांनीही कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सरपंचांना पत्र पाठवून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत ग्रामपातळीवर काय करता येईल यासाठी आठवड्यातून एक दिवस ग्रामसभा घेण्याचे फर्मान काढले आहे. मुळात कोरोनाविषयी अजूनही समाजात अनेक समज-गैरसमज असून, सर्वसाधारणपणे सर्दी, खोकल्याचे प्राथमिक लक्षणांतूनच या आजाराचे निदान होत असते. सध्या हवामानातील बदल पाहता, सर्वत्र सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येतात. अशा परिस्थितीत विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो नागरिकांना एकमेकांपासून दूर ठेवणे हाच उपाय असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. परंतु ग्रामविकास विभागाने गावोगावी ग्रामसभा घेण्याची सक्ती करून विखुरलेल्या ग्रामस्थांना पुन्हा एकत्र आणून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाच हरताळ फासला जाणार आहे. एकीकडे नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून कायद्याचा धाक दाखवायचा तर दुसरीकडे याच नागरिकांनी एकत्र यावे यासाठी ग्रामसभा घ्यायच्या अशा परस्पर भिन्न निर्णयामुळे ग्रामविकास अधिकारी पेचात सापडले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद