शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

कऱ्हीच्या ग्रामस्थांचे ग्रामविकास मंत्र्यांना साकडें

By admin | Updated: September 12, 2015 22:37 IST

मागणी : जलयुक्त शिवार योजनेत समावेश करा

मनमाड : नांदगाव तालुक्यातील कऱ्ही गावाला अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. अनेक वर्षांपासन दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या गावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. नांदगाव व येवला तालुक्याच्या सरहद्दीवरील डोंगराळ भागात वसलेल्या कऱ्ही या गावात पावसाच्या अल्पप्रमाणामुळे अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते. २००२ सालापासून या गावी उन्हाळ्यात पिण्यासाठी शासनाकडून टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. दर वर्षी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असतो. कऱ्ही हे गाव पाणलोट क्षेत्रात येत असूनही हेतूपुरस्कर जलयुक्त शिवार योजनेतून गावास टाळ्ण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी विभागाकडे वारंवार मागणी करूनही जलयुक्त शिवार योजनेमध्ये कऱ्ही गावाचा समावेश करण्यात आलेला नाही. सदर योजना गावात नसल्याने शेतकरीवर्गाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तरी ग्रामस्थांच्या मागणीच्या निवेदनाचा सहानुभूती पूर्वक विचार करून जलयुक्त शिवार मोहीम सुरू करावी, या मागणीसाठी कऱ्ही ग्रामस्थांच्या वतीने सरपंच आशाबाई काकड, सोसायटी अध्यक्ष सुधाकर घुगे, उपसरपंच दशरथ लहिरे, ग्रा.पं. सदस्य देवराम ढाकणे, गोरख सोनवणे, वाल्मीक लहिरे, सोमनाथ डोंगरे, साईनाथ दराडे, वाल्मीक सानप, अण्णा घुगे, रामकृष्ण डोंगरे, चिंतामण डोमाडे, भावराव घुगे यांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. (वार्ताहर)