शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हीच्या ग्रामस्थांचे ग्रामविकास मंत्र्यांना साकडें

By admin | Updated: September 12, 2015 22:37 IST

मागणी : जलयुक्त शिवार योजनेत समावेश करा

मनमाड : नांदगाव तालुक्यातील कऱ्ही गावाला अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. अनेक वर्षांपासन दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या गावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. नांदगाव व येवला तालुक्याच्या सरहद्दीवरील डोंगराळ भागात वसलेल्या कऱ्ही या गावात पावसाच्या अल्पप्रमाणामुळे अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते. २००२ सालापासून या गावी उन्हाळ्यात पिण्यासाठी शासनाकडून टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. दर वर्षी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असतो. कऱ्ही हे गाव पाणलोट क्षेत्रात येत असूनही हेतूपुरस्कर जलयुक्त शिवार योजनेतून गावास टाळ्ण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी विभागाकडे वारंवार मागणी करूनही जलयुक्त शिवार योजनेमध्ये कऱ्ही गावाचा समावेश करण्यात आलेला नाही. सदर योजना गावात नसल्याने शेतकरीवर्गाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तरी ग्रामस्थांच्या मागणीच्या निवेदनाचा सहानुभूती पूर्वक विचार करून जलयुक्त शिवार मोहीम सुरू करावी, या मागणीसाठी कऱ्ही ग्रामस्थांच्या वतीने सरपंच आशाबाई काकड, सोसायटी अध्यक्ष सुधाकर घुगे, उपसरपंच दशरथ लहिरे, ग्रा.पं. सदस्य देवराम ढाकणे, गोरख सोनवणे, वाल्मीक लहिरे, सोमनाथ डोंगरे, साईनाथ दराडे, वाल्मीक सानप, अण्णा घुगे, रामकृष्ण डोंगरे, चिंतामण डोमाडे, भावराव घुगे यांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. (वार्ताहर)