शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

कऱ्हीच्या ग्रामस्थांचे ग्रामविकास मंत्र्यांना साकडें

By admin | Updated: September 12, 2015 22:37 IST

मागणी : जलयुक्त शिवार योजनेत समावेश करा

मनमाड : नांदगाव तालुक्यातील कऱ्ही गावाला अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. अनेक वर्षांपासन दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या गावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. नांदगाव व येवला तालुक्याच्या सरहद्दीवरील डोंगराळ भागात वसलेल्या कऱ्ही या गावात पावसाच्या अल्पप्रमाणामुळे अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते. २००२ सालापासून या गावी उन्हाळ्यात पिण्यासाठी शासनाकडून टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. दर वर्षी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असतो. कऱ्ही हे गाव पाणलोट क्षेत्रात येत असूनही हेतूपुरस्कर जलयुक्त शिवार योजनेतून गावास टाळ्ण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी विभागाकडे वारंवार मागणी करूनही जलयुक्त शिवार योजनेमध्ये कऱ्ही गावाचा समावेश करण्यात आलेला नाही. सदर योजना गावात नसल्याने शेतकरीवर्गाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तरी ग्रामस्थांच्या मागणीच्या निवेदनाचा सहानुभूती पूर्वक विचार करून जलयुक्त शिवार मोहीम सुरू करावी, या मागणीसाठी कऱ्ही ग्रामस्थांच्या वतीने सरपंच आशाबाई काकड, सोसायटी अध्यक्ष सुधाकर घुगे, उपसरपंच दशरथ लहिरे, ग्रा.पं. सदस्य देवराम ढाकणे, गोरख सोनवणे, वाल्मीक लहिरे, सोमनाथ डोंगरे, साईनाथ दराडे, वाल्मीक सानप, अण्णा घुगे, रामकृष्ण डोंगरे, चिंतामण डोमाडे, भावराव घुगे यांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. (वार्ताहर)