शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्याची धावपळ

By admin | Updated: April 1, 2017 21:15 IST

डिजिटाइझेशन करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अखेरच्या चौथ्या टप्प्याची मुदत ३१ मार्चअखेर संपुष्टात

नाशिक : उपग्रहाद्वारे प्रक्षेपित होणारे खासगी दूरचित्रवाहिन्यांचे मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या यंत्रणेचे संपूर्ण डिजिटाइझेशन करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अखेरच्या चौथ्या टप्प्याची मुदत ३१ मार्चअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्यातील १५१३४ केबलधारकांचे प्रक्षेपण खंडित करण्यात आल्याने ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. केंद्र सरकारने सन २०१२ मध्ये केबल प्रक्षेपणाचे संपूर्ण डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला, त्यामागे ग्राहकांना अधिकाधिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा त्याचबरोबर करमणूक कराची चोरी रोखता यावी हा हेतू असल्याने पहिल्या टप्प्यात देशातील ९२ महानगरांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली व सेटटॉप बॉक्स बसविल्याशिवाय कार्यक्रम दूरचित्रवाणीवर दिसू शकणार नाही, अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यानंतर मात्र टप्पाटप्प्याने संपूर्ण देशात डिजिटायझेशन करण्यात आले. या योजनेचा अखेरचा टप्पा डिसेंबर २०१६ मध्येच संपुष्टात येणार होता. तथापि, शासनाने ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बदलून देण्यासाठी नागरिकांना तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली. त्यानुसार ३१ मार्च अखेरची मुदत होती. चौथ्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती वगळता ग्रामपंचायत पातळीवरील गावांमध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याचा समावेश होता. शासनाने वेळोवेळी आवाहन करूनही जिल्ह्यातील १५१३४ नागरिकांनी सेटटॉप बॉक्स न बसविल्याने शुक्रवारी रात्री बारा वाजेनंतर त्यांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने डेन, हाथवे, इंड्स या तीन प्रमुख कंपन्यांच्या एमएसओंना पत्र देऊन प्रक्षेपण बंद करण्याबाबत तीन दिवसांत अहवालही मागविला आहे.