शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

‘स्वच्छ शहर’ प्रतिसादासाठी महापालिकेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:05 IST

शहरात केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथक येण्यापूर्वी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असताना मालेगावच्या तुलनेत नाशिक शहर मागे पडल्याचे चित्र आहे.

नाशिक : शहरात केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथक येण्यापूर्वी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असताना मालेगावच्या तुलनेत नाशिक शहर मागे पडल्याचे चित्र आहे. मालेगावमध्ये नऊशेहून अधिक नागरिकांनी प्रतिसादासाठी कॉल केले असताना नाशिकमध्ये मात्र अवघे साडेसहाशेच नागरिक जागरूक ठरले आहेत. त्यामुळे महापालिकेने अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छ शहरासाठी केंद्र शासनाकडे प्रतिसाद नोंदविला आहे.केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ शहरांसाठी अभियान राबविले जात असून, त्याअंतर्गत देशभरातील शहरात स्पर्धा घेतली जाते. शहरात अस्वच्छतेची ठिकाणे कमीत कमी व्हावा, घनकचरा व्यवस्थापनाचा अधिकाधिक वापर व्हावा, सार्वजनिक शौचालये स्वच्छ असावीत तसेच त्याचप्रमाणे घरगुती कचऱ्याचेदेखील वर्गीकरण व्हावे हा या मागील शासनाचा उद्देश असतो. महापालिका त्यादृष्टीने प्रयत्न करीत असतात. परंतु तरीही याबाबत स्थानिक नागरिकांना कितपत माहिती आहे, तसेच त्यांचे स्वच्छतेबाबत ज्ञान किती याचादेखील आढावा घेण्यासाठी केंद्रशासनाच्या वतीने नागरिकांचा प्रतिसाद घेतला जातो.यासंदर्भात प्रत्यक्ष पथक शहरात दाखल झाल्यानंतर ते तर नागरिकांशी चर्चा करतेच, परंतु १९६९ हा टोल फ्री क्रमांक असून, त्यातूनही नागरिकांनी फोन करून प्रतिसाद नोंदवायचा असतो. परतुं त्यात नाशिक शहरातील नागरिक कमी पडत आहेत. मालेगाव येथील नागरिकांनी केलेले कॉल हे नऊशेहून अधिक आहेत. मात्र, नाशिक महापालिकेसंदर्भातील केवळ साडेसहाशे कॉल्सच झाले आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी असा द्यावा प्रतिसादमहापालिकेच्या स्वच्छतेसंदर्भात प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांनी १०६९ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर तो फोन कट होतो आणि त्यांनतर पुन्हा कॉल येतो, त्यावर विचारण्यात येणाºया प्रश्नांसाठी पर्याय दिला जातो व त्यानुसार प्रतिसाद दिल्यानंतर नोंद केली जाते. फोन करणाºया व्यक्तीची व्यक्तिगत माहिती घेऊन ती संकलित केली जाते. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.प्रतिसाद कमीच  त्रास अधिकमहापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी प्रयत्न केले जात असून, विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सुलभ शौचालयत आरसे, पेपर नॅपकीनदेखील ठेवण्यात आले आहेत. मात्र तेदेखील चोरीस जात असल्याने महापालिकेची अडचण अधिकच वाढली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान