शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

‘स्वच्छ शहर’ प्रतिसादासाठी महापालिकेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:05 IST

शहरात केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथक येण्यापूर्वी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असताना मालेगावच्या तुलनेत नाशिक शहर मागे पडल्याचे चित्र आहे.

नाशिक : शहरात केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथक येण्यापूर्वी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असताना मालेगावच्या तुलनेत नाशिक शहर मागे पडल्याचे चित्र आहे. मालेगावमध्ये नऊशेहून अधिक नागरिकांनी प्रतिसादासाठी कॉल केले असताना नाशिकमध्ये मात्र अवघे साडेसहाशेच नागरिक जागरूक ठरले आहेत. त्यामुळे महापालिकेने अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छ शहरासाठी केंद्र शासनाकडे प्रतिसाद नोंदविला आहे.केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ शहरांसाठी अभियान राबविले जात असून, त्याअंतर्गत देशभरातील शहरात स्पर्धा घेतली जाते. शहरात अस्वच्छतेची ठिकाणे कमीत कमी व्हावा, घनकचरा व्यवस्थापनाचा अधिकाधिक वापर व्हावा, सार्वजनिक शौचालये स्वच्छ असावीत तसेच त्याचप्रमाणे घरगुती कचऱ्याचेदेखील वर्गीकरण व्हावे हा या मागील शासनाचा उद्देश असतो. महापालिका त्यादृष्टीने प्रयत्न करीत असतात. परंतु तरीही याबाबत स्थानिक नागरिकांना कितपत माहिती आहे, तसेच त्यांचे स्वच्छतेबाबत ज्ञान किती याचादेखील आढावा घेण्यासाठी केंद्रशासनाच्या वतीने नागरिकांचा प्रतिसाद घेतला जातो.यासंदर्भात प्रत्यक्ष पथक शहरात दाखल झाल्यानंतर ते तर नागरिकांशी चर्चा करतेच, परंतु १९६९ हा टोल फ्री क्रमांक असून, त्यातूनही नागरिकांनी फोन करून प्रतिसाद नोंदवायचा असतो. परतुं त्यात नाशिक शहरातील नागरिक कमी पडत आहेत. मालेगाव येथील नागरिकांनी केलेले कॉल हे नऊशेहून अधिक आहेत. मात्र, नाशिक महापालिकेसंदर्भातील केवळ साडेसहाशे कॉल्सच झाले आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी असा द्यावा प्रतिसादमहापालिकेच्या स्वच्छतेसंदर्भात प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांनी १०६९ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर तो फोन कट होतो आणि त्यांनतर पुन्हा कॉल येतो, त्यावर विचारण्यात येणाºया प्रश्नांसाठी पर्याय दिला जातो व त्यानुसार प्रतिसाद दिल्यानंतर नोंद केली जाते. फोन करणाºया व्यक्तीची व्यक्तिगत माहिती घेऊन ती संकलित केली जाते. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.प्रतिसाद कमीच  त्रास अधिकमहापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी प्रयत्न केले जात असून, विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सुलभ शौचालयत आरसे, पेपर नॅपकीनदेखील ठेवण्यात आले आहेत. मात्र तेदेखील चोरीस जात असल्याने महापालिकेची अडचण अधिकच वाढली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान