शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राज्यकर्त्यांनी संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वाकडे दुर्लक्ष केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 01:16 IST

देशातील अर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वाकडे राज्यकर्त्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे देशातील अर्थिक व सामाजिक विषमतेचा प्रश्न अद्यापही कायम असून, त्याचा थेट परिणाम आजच्या लोकशाहीवर होत आहे. त्यामुळे देशाच्या संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद के लेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कायद्याच्या स्वरूपात अंमलजावणीसोबतच लोकशाही मजबूत करण्यासाठी सध्याच्या निवडणूक पद्धतीतही बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आयटकचे नेते डॉ. राम बाहेती यांनी केले.

ठळक मुद्देराम बाहेती : गोविंद पानसरे स्मृती व्याखानमालेस प्रारंभ

नाशिक : देशातील अर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वाकडे राज्यकर्त्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे देशातील अर्थिक व सामाजिक विषमतेचा प्रश्न अद्यापही कायम असून, त्याचा थेट परिणाम आजच्या लोकशाहीवर होत आहे. त्यामुळे देशाच्या संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद के लेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कायद्याच्या स्वरूपात अंमलजावणीसोबतच लोकशाही मजबूत करण्यासाठी सध्याच्या निवडणूक पद्धतीतही बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आयटकचे नेते डॉ. राम बाहेती यांनी केले. द्वारका परिसरातील कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृहात शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. राम बाहेती यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘भारतीय संविधान, लोकशाहीपुढील आव्हाने व निवडणूक सुधारणा’ या विषयावर शनिवारी (दि. १६) दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील लोकशाहीचा डोलारा अबाधित राखण्यासाठी देशात अर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्याची गरज आहे.ही गोष्ट लक्षात घेऊन संविधान तयार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासारख्या गोष्टी मूलभूत अधिकारात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तत्कालीन परिस्थिती आणि विरोधामुळे त्यांना अनेक गोष्टी संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट कराव्या लागल्या. या गोष्टींकडे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेत आलेल्या राजकर्त्यांनी दुर्लक्ष केले. काही सत्ताधाऱ्यांनी तर अक्षरश: घटनेला नख लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी देशात संविधान जाळण्याचा प्रकार घडल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी अ‍ॅड. मनीष बस्ते, करुणासागर पगारे, नितीन डांगे, महादेव खुडे आदींसह पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.मोफत शिक्षणाकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्षसामाजिक विषमता दूर करण्यासाठी संविधानात चौदा वर्षांपर्यंत प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही तरतुदींचा समावेश केला आहे. मात्र राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर २००९ मध्ये प्राथमिक शिक्षणाचा कायदा करण्यात आला. त्यातही सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना यातून वगळण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.४नाशिक शहरात सुरू गेल्या असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती व्याख्यानमालेच्या धर्तीवर पानसरे व्याख्यानमालेची सुरुवात केली असून, या व्याख्यानमालेअंतर्गत नाशिक शहरासह विविध तालुका आणि गावस्तरावरही वेगवेगळ्या विषयांवर व्यााख्यानांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राजू देसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दिली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक