शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

राज्यकर्त्यांनी संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वाकडे दुर्लक्ष केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 01:16 IST

देशातील अर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वाकडे राज्यकर्त्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे देशातील अर्थिक व सामाजिक विषमतेचा प्रश्न अद्यापही कायम असून, त्याचा थेट परिणाम आजच्या लोकशाहीवर होत आहे. त्यामुळे देशाच्या संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद के लेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कायद्याच्या स्वरूपात अंमलजावणीसोबतच लोकशाही मजबूत करण्यासाठी सध्याच्या निवडणूक पद्धतीतही बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आयटकचे नेते डॉ. राम बाहेती यांनी केले.

ठळक मुद्देराम बाहेती : गोविंद पानसरे स्मृती व्याखानमालेस प्रारंभ

नाशिक : देशातील अर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वाकडे राज्यकर्त्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे देशातील अर्थिक व सामाजिक विषमतेचा प्रश्न अद्यापही कायम असून, त्याचा थेट परिणाम आजच्या लोकशाहीवर होत आहे. त्यामुळे देशाच्या संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद के लेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कायद्याच्या स्वरूपात अंमलजावणीसोबतच लोकशाही मजबूत करण्यासाठी सध्याच्या निवडणूक पद्धतीतही बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आयटकचे नेते डॉ. राम बाहेती यांनी केले. द्वारका परिसरातील कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृहात शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. राम बाहेती यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘भारतीय संविधान, लोकशाहीपुढील आव्हाने व निवडणूक सुधारणा’ या विषयावर शनिवारी (दि. १६) दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील लोकशाहीचा डोलारा अबाधित राखण्यासाठी देशात अर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्याची गरज आहे.ही गोष्ट लक्षात घेऊन संविधान तयार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासारख्या गोष्टी मूलभूत अधिकारात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तत्कालीन परिस्थिती आणि विरोधामुळे त्यांना अनेक गोष्टी संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट कराव्या लागल्या. या गोष्टींकडे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेत आलेल्या राजकर्त्यांनी दुर्लक्ष केले. काही सत्ताधाऱ्यांनी तर अक्षरश: घटनेला नख लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी देशात संविधान जाळण्याचा प्रकार घडल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी अ‍ॅड. मनीष बस्ते, करुणासागर पगारे, नितीन डांगे, महादेव खुडे आदींसह पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.मोफत शिक्षणाकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्षसामाजिक विषमता दूर करण्यासाठी संविधानात चौदा वर्षांपर्यंत प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही तरतुदींचा समावेश केला आहे. मात्र राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर २००९ मध्ये प्राथमिक शिक्षणाचा कायदा करण्यात आला. त्यातही सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना यातून वगळण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.४नाशिक शहरात सुरू गेल्या असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती व्याख्यानमालेच्या धर्तीवर पानसरे व्याख्यानमालेची सुरुवात केली असून, या व्याख्यानमालेअंतर्गत नाशिक शहरासह विविध तालुका आणि गावस्तरावरही वेगवेगळ्या विषयांवर व्यााख्यानांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राजू देसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दिली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक