शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

नियमांची पायमल्ली : रस्ते अपघातात तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; अतिआत्मविश्वास जीवघेणा मानवी चुकांमुळे घडतात सर्वाधिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:18 IST

नाशिक : रस्ते अपघात हा महाराष्टÑासमोरील सर्वात गंभीर प्रश्न असून, त्यापेक्षाही अपघातात तरुणांचा होणारा मृत्यू चिंता करण्यास लावणारा आहे.

ठळक मुद्देअपघातात महाराष्टÑाचा क्रमांक दुसराजागरूक राहण्याबाबतचे प्रबोधन

नाशिक : रस्ते अपघात हा महाराष्टÑासमोरील सर्वात गंभीर प्रश्न असून, त्यापेक्षाही अपघातात तरुणांचा होणारा मृत्यू चिंता करण्यास लावणारा आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्टÑाचा क्रमांक दुसरा आहे. तरुणाईचा फाजील आत्मविश्वास आणि बेधुंद प्रवृत्ती यामुळे वाढले आहेत. सुरक्षिततेसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे पालन न करता बेफिकरी दाखविणारे तरुण अपघातात बळी गेले आहेत. १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरात १६३ जीवघेणे अपघात झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ ने वाढ झाली आहे़ प्रत्येक महिन्यात किमान पंधरा जीवघेणे अपघात होत आहेत.सुरक्षित वाहसुकीसाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने अनेक उपाययोजना आखल्या जातात. सुरक्षिततेसाठी जनजागृतीदेखील केली जाते. प्रत्येक सिग्नलवर वाहनधारकांना सुरक्षिततेसाठी जागरूक राहण्याबाबतचे पोलीस प्रबोधन करीत असतात किंबहूना गेल्या वर्षी सुरक्षितसेसाठी पोलिसांनी व्यापक मोहीमही राबविली होती. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन वाहनधारकांना सुरक्षिततेचा ‘पाठ’ शिकविण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. परंतु केवळ मोहिमेपुरते वाहनधारक सजगता दाखवितात. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असा पोलिसांचा अनुभव आहे. वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसांआड एका जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरात १६३ जीवघेणे अपघात झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ने वाढ झाली आहे़ प्रत्येक महिन्यात किमान पंधरा जीवघेणे अपघात होत असून, यामध्ये मृत्युमुखी पडणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे़ अपघातात मृतांच्या संख्येपैकी सुमारे ५० टक्के मृत्यू हे २० ते ४० या वयोगटांतील तरुण असतात़ यातील महत्त्वाची बाब म्हणजे ८४ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे़ महाराष्ट्रात सर्वाधिक अपघात हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा, कल्याण-नगर-बीड, पुणे- नाशिक, पुणे-सोलापूर, नगर-औरंगाबाद या महामार्गावरील रस्त्यांवर होत असून, यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़ तरुणांमध्ये आलेली बेफिकिरी अपघाताला आमंत्रण देणारी असते. रस्त्यावरून चालणारा चालक हा रस्त्यावर इतरांचा विचार न करता आपल्याच मस्तीत वाहन चालवित असल्याने त्याच्याबरोबर इतरांनाही अधिक धोका असतो. अलीकडे आलेल्या जादा सीसीच्या दुचाकी आणि डिस्क ब्रेकमुळे भरधाव वेगात दुचाकी चालविण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यातच रस्त्त्यावरून वाहन चालविताना आपल्याला कुणीही विचारते होऊ नये अशीच मानसिकता चालकाची असते याचमुळे तो प्रसंगी अटकाव करणाºया पोलिसांच्याही अंगावर धाऊन जात असल्याची उदाहरणे नाशिक शहरात घडली आहेत.सिग्नल तोडण्याची मानसिकताशहरात असलेले सिग्नल वाहतुकीची सुरक्षिता म्हणून बनविण्यात आलेले आहेत. परंतु सिग्नलवर थांबणे वाहनधारकाला कमीपणाचे वाटते. किंबहूना इतर लोक सिग्लवर थांबलेले असताना बेशिस्त चालक त्यांनाच मुर्ख समजून सिग्नल तोडून निघून जातात. सिग्नल हा तोडण्यासाठीच असतो अशी मानसिकता बळावू लागली आहे. ही मोठी गंभीर समस्या बनण्याची सुरुवात झालेली आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती अवजड दुचाकी देण्याचे पालकांचे चोचले त्यांनाच पश्चात्ताप करण्यास लावणारे ठरत आहेत. परंतु पालक यातून कोणताही धडा घेण्यास तयार नाहीत. लाखो रुपयांच्या वेगवान दुचाकी पालक आपल्या पाल्याच्या हाती सोपवत आहेत. पालकांनीदेखील आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी घरातूनच त्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.कठोर कायद्याची गरजतरुणांच्या बेशिस्त वाहन हाकण्याला खरेतर कायद्याने जरब बसविण्याची आवश्यकता आहे. परदेशात ज्याप्रमाणे वाहतुकीचे कायदे आहेत तसे कायदे भारतात नसल्याने त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. इतकेच नव्हे तर बेशिस्त वाहनधारकाला शिस्त लावण्यासाठी वाहतूक व्यवस्थेसाठीच्या ज्या अद्ययावत यंत्रणा आहेत त्याचाही अभाव आहे. त्यामुळे रस्ते अपघातानंतर वाहनधारक पळून जाण्यास यशस्वी होत असल्याने गुन्ह्याचेही प्रमाण वाढले आहे. मोटार वाहन कायदे हे अदखलपात्र आणि किरकोळ तडजोडीचे असल्यामुळे वाहनचालकांना या कायद्याचा धाक वाटत नाही़ त्यामुळे गुन्हेगारी रोखण्याबरोबरच तरुणांची बेफिकिरी रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे.