शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

नियमांची पायमल्ली : रस्ते अपघातात तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; अतिआत्मविश्वास जीवघेणा मानवी चुकांमुळे घडतात सर्वाधिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:18 IST

नाशिक : रस्ते अपघात हा महाराष्टÑासमोरील सर्वात गंभीर प्रश्न असून, त्यापेक्षाही अपघातात तरुणांचा होणारा मृत्यू चिंता करण्यास लावणारा आहे.

ठळक मुद्देअपघातात महाराष्टÑाचा क्रमांक दुसराजागरूक राहण्याबाबतचे प्रबोधन

नाशिक : रस्ते अपघात हा महाराष्टÑासमोरील सर्वात गंभीर प्रश्न असून, त्यापेक्षाही अपघातात तरुणांचा होणारा मृत्यू चिंता करण्यास लावणारा आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्टÑाचा क्रमांक दुसरा आहे. तरुणाईचा फाजील आत्मविश्वास आणि बेधुंद प्रवृत्ती यामुळे वाढले आहेत. सुरक्षिततेसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे पालन न करता बेफिकरी दाखविणारे तरुण अपघातात बळी गेले आहेत. १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरात १६३ जीवघेणे अपघात झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ ने वाढ झाली आहे़ प्रत्येक महिन्यात किमान पंधरा जीवघेणे अपघात होत आहेत.सुरक्षित वाहसुकीसाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने अनेक उपाययोजना आखल्या जातात. सुरक्षिततेसाठी जनजागृतीदेखील केली जाते. प्रत्येक सिग्नलवर वाहनधारकांना सुरक्षिततेसाठी जागरूक राहण्याबाबतचे पोलीस प्रबोधन करीत असतात किंबहूना गेल्या वर्षी सुरक्षितसेसाठी पोलिसांनी व्यापक मोहीमही राबविली होती. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन वाहनधारकांना सुरक्षिततेचा ‘पाठ’ शिकविण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. परंतु केवळ मोहिमेपुरते वाहनधारक सजगता दाखवितात. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असा पोलिसांचा अनुभव आहे. वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसांआड एका जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरात १६३ जीवघेणे अपघात झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ने वाढ झाली आहे़ प्रत्येक महिन्यात किमान पंधरा जीवघेणे अपघात होत असून, यामध्ये मृत्युमुखी पडणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे़ अपघातात मृतांच्या संख्येपैकी सुमारे ५० टक्के मृत्यू हे २० ते ४० या वयोगटांतील तरुण असतात़ यातील महत्त्वाची बाब म्हणजे ८४ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे़ महाराष्ट्रात सर्वाधिक अपघात हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा, कल्याण-नगर-बीड, पुणे- नाशिक, पुणे-सोलापूर, नगर-औरंगाबाद या महामार्गावरील रस्त्यांवर होत असून, यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़ तरुणांमध्ये आलेली बेफिकिरी अपघाताला आमंत्रण देणारी असते. रस्त्यावरून चालणारा चालक हा रस्त्यावर इतरांचा विचार न करता आपल्याच मस्तीत वाहन चालवित असल्याने त्याच्याबरोबर इतरांनाही अधिक धोका असतो. अलीकडे आलेल्या जादा सीसीच्या दुचाकी आणि डिस्क ब्रेकमुळे भरधाव वेगात दुचाकी चालविण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यातच रस्त्त्यावरून वाहन चालविताना आपल्याला कुणीही विचारते होऊ नये अशीच मानसिकता चालकाची असते याचमुळे तो प्रसंगी अटकाव करणाºया पोलिसांच्याही अंगावर धाऊन जात असल्याची उदाहरणे नाशिक शहरात घडली आहेत.सिग्नल तोडण्याची मानसिकताशहरात असलेले सिग्नल वाहतुकीची सुरक्षिता म्हणून बनविण्यात आलेले आहेत. परंतु सिग्नलवर थांबणे वाहनधारकाला कमीपणाचे वाटते. किंबहूना इतर लोक सिग्लवर थांबलेले असताना बेशिस्त चालक त्यांनाच मुर्ख समजून सिग्नल तोडून निघून जातात. सिग्नल हा तोडण्यासाठीच असतो अशी मानसिकता बळावू लागली आहे. ही मोठी गंभीर समस्या बनण्याची सुरुवात झालेली आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती अवजड दुचाकी देण्याचे पालकांचे चोचले त्यांनाच पश्चात्ताप करण्यास लावणारे ठरत आहेत. परंतु पालक यातून कोणताही धडा घेण्यास तयार नाहीत. लाखो रुपयांच्या वेगवान दुचाकी पालक आपल्या पाल्याच्या हाती सोपवत आहेत. पालकांनीदेखील आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी घरातूनच त्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.कठोर कायद्याची गरजतरुणांच्या बेशिस्त वाहन हाकण्याला खरेतर कायद्याने जरब बसविण्याची आवश्यकता आहे. परदेशात ज्याप्रमाणे वाहतुकीचे कायदे आहेत तसे कायदे भारतात नसल्याने त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. इतकेच नव्हे तर बेशिस्त वाहनधारकाला शिस्त लावण्यासाठी वाहतूक व्यवस्थेसाठीच्या ज्या अद्ययावत यंत्रणा आहेत त्याचाही अभाव आहे. त्यामुळे रस्ते अपघातानंतर वाहनधारक पळून जाण्यास यशस्वी होत असल्याने गुन्ह्याचेही प्रमाण वाढले आहे. मोटार वाहन कायदे हे अदखलपात्र आणि किरकोळ तडजोडीचे असल्यामुळे वाहनचालकांना या कायद्याचा धाक वाटत नाही़ त्यामुळे गुन्हेगारी रोखण्याबरोबरच तरुणांची बेफिकिरी रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे.