शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यातील 2163 शेतकऱ्यांकडून वसूल होणार अडीच कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 15:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : तालुक्यातील 2163 आयकर भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत जमा झालेला निधी ...

ठळक मुद्देपंतप्रधान किसान योजना : आयकर धारक शेतकऱ्यांकडून वसुलीस प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील 2163 आयकर भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत जमा झालेला निधी परत वसूल केला जाणार आहे. सिन्नरच्या तहसील विभागाने शेतकऱ्यांकडून निधी वसुलीला सुरुवात केली असून दोन कोटी 50 लाख रुपये पुन्हा मिळविले जाणार आहेत.पंतप्रधान किसान योजनेचा लाभ बनावट शेतकरी लाभार्थ्यांनी घेतल्याचे व मोठ्या प्रमाणावर निधीला गळती लागल्याचे उघड झाल्यावर केंद्र सरकारने आता देशव्यापी चौकशीचे आदेश दिले आहेत. तामिळनाडूत या योजनेतील मोठा घोटाळा उघडकीस आला होता. लाभार्थी हा खरोखरच शेतकरीच आहे याची प्रत्यक्ष खातरजमा करून घेण्यास राज्य सरकारांना केंद्र सरकारने सांगितले आहे.केंद्र सरकारने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढले होते. त्यानुसार तालुकास्तरावर आयकर धारक शेतकऱ्यांसह मयत, चुकीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जात आहे. त्यानुसार तालुक्यातील 2163 शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचे काम करण्यात येत आहे. एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च या महिन्यांच्या कालावधीत समान हप्त्याने सहा हजार रुपयांचा लाभ पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यात येतो. 2019 ला सुरू झालेल्या या योजनेद्वारे आत्तापर्यंत किमान दहा हजार रुपये लाभ खात्यांवर जमा झाला आहे. वसूल रक्कम जमा करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले आहे.चौकट-'एकही पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये असे शासनाचे धोरण आहे. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे इतर साधन आहे त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये. आयकर भरणारे शेतकरी आधार लिंक मुळे समोर आले आहेत. त्यांची यादी तयार असून त्यांना नोटिसा बजविण्यात येत आहे. या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यावर आलेला निधी त्वरित तहसील कार्यलयात भरावा.राहुल कोताडे, तहसीलदार, सिन्नरस्वतंत्र वसुली कक्षाची स्थापनाअपात्र शेतकऱ्यांकडून निधी परत वसूल करण्यासाठी तहसीलदार राहुल कोताडे यांनी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली आहे. अव्वल कारकून सी. बी. मरकड, कृषी पर्यवेक्षक डी. एस. डेंगळे, कृषी अधिकारी आर. एस. पवार यांची कक्ष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निधी वसुलीचे व्यापक काम असल्याने कक्षामार्फत स्वतंत्र कामकाज चालणार आहे.

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीFarmerशेतकरी