शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

कोबी, शेवगा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:56 IST

लोहोणेर : कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करत असताना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबी, शेवगा पिकावर रोटर फिरवून संताप व्यक्त केला.

लोहोणेर : कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करत असताना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबी, शेवगा पिकावर रोटर फिरवून संताप व्यक्त केला.संचारबंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पिकवून शहरवासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून देवळा, कळवण व इतर परिसरात लहान-मोठ्या शेतकºयांनी कोबी, टमाटे, मिरची, खरबूज, टरबूज, वांगी यांची लागवड केली आहे.गेल्या ४० ते ४५ दिवसांपासून लॉकडाउनमुळे कोणीही व्यापारी खरेदीसाठी इकडे फिरकत नसल्याकारणाने व खेड्यापाड्यासह तालुकास्तरावरील सर्व आठवडे बाजार बंद असल्याकारणाने, शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला विकावा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोबी, शेवगा, मिरची, टमाटे, इत्यादी खराब होणारे पीक असल्याने ते तोडून नेणे गरजेचे आहे. परंतु बाहेर मागणी जरी असली तरी तो माल खुडून विक्रीसाठी व्यापारी खरेदी करण्यासाठी येत नाहीत.--------------------शेतातच पीक खराबदेवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील माजी सैनिक दीपक झाल्टे यांनी आपल्या शेतातील ३० गुंठे तयार कोबी पिकावर भाव मिळत नसल्यानेरोटर फिरवला असून, शासनाने भाजीपाला, फळे विक्र ीसाठी पुढाकार घेऊन यंत्रणा उभी करून आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच वर्षभर पाणी घालून तयार केलेले शेवगा पीक बुडासकट तोडले आहे. दुसरीकडे टरबूज, खरबूज या फळांना एप्रिल-मे महिन्यात मोठी मागणी असते. रमजान व अक्षय्यतृतीया या धार्मिक सणाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर खप असल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात या फळांची लागवड केली आहे. परंतु संचारबंदी असल्यामुळे मालेगावसह नाशिक, सुरत, अहमदाबादकडचे व्यापारी देवळा तालुक्यात खरेदीसाठी फिरकत नसल्याकारणाने शेतकºयाची फळं शेतातच खराब होत आहेत. थोड्या प्रमाणात शेतकरी हात विक्र ीने गावोगाव व तालुकास्तरावर विकण्यास नेताना दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक