शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 16:08 IST

येवला : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

येवला : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गासह प्रहार संघटनेने प्रशासनाकडे केली होती.यावर्षी धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस ओव्हरफ्लो आवर्तन सोडण्यात आले होते.या आवर्तनातून तालुक्यातील सर्व लहान-मोठे बंधारे भरण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मागील महिन्यात रब्बीसाठी आवर्तन दिल्याने शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व भाजीपाला पिकांना या आवर्तनाचा लाभ झाला होता. सध्या कडक उन्हाचे दिवस सुरू झाल्याने पिकांना पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विहिरीतील पाण्याचा उपसा लवकर होत असल्याने पिकांना पाणीटंचाईचा फटका बसला असल्याने कालव्यास आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याचप्रमाणे येवला तालुक्यात पाटपाण्याच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात द्राक्ष व डाळिंबबागा असून, त्यांनाही पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्गातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. पालखेडचे पहिले आवर्तन वेळेवर सुटल्याने तसेच विहिरींना पाणी असल्याने पाण्याची समस्या जाणवली नाही, परंतु गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून बºयाच तालुक्यातील सर्वच विहिरींनी तळ गाठल्याने पिके करपण्याचा धोका निर्माण झाला. अशातच प्रशासनाच्या नेहमीच्या कारभारानुसार पाण्याचे नियोजन येत्या वीस तारखेनंतर येणार होते, परंतु प्रहार संघटनेने व शेतकरी यांनी निवेदनाद्वारे परिस्थिती समजावून सांगत आंदोलनाचा इशारा दिला. यामुळे संबंधित प्रशासनाने पालखेड धरणातून पाणी सोडण्यास सुरु वात केली आहे. यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी