शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

वृत्तपत्रांची भूमिका समाजासाठी कायमच मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:50 IST

नाशिक : कोरोना संकटाच्या काळात वृत्तपत्रांनी बजावलेली भूमिका वाखाणण्याजोगीच म्हणावी लागेल. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राला भान ...

नाशिक : कोरोना संकटाच्या काळात वृत्तपत्रांनी बजावलेली भूमिका वाखाणण्याजोगीच म्हणावी लागेल. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राला भान आणून देण्याचे काम वृत्तपत्रे करतात. त्याचबरोबर समाजालादेखील मार्गदर्शनाची भूमिका बजावत असतात. वृत्तपत्रांमधून विविध क्षेत्रांतील घडामोडींविषयी अचूक व विश्वासार्ह माहिती सविस्तरपणे वाचकांपर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेनेही वृत्तपत्र सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वृत्तपत्र वाचन पूर्वीप्रमाणेच आनंददायी बनले आहे, असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले आहे.----------------सकाळी समोर चहाचा कप, हातात वृत्तपत्र ही मराठी माणसांची दिवसाच्या चांगल्या सुरु वातीची कल्पना आहे. काही दिवस वृत्तपत्रे येत नव्हती. आपण सगळेच या सुखाला पारखे झालो होतो. आता हा आनंद पुन्हा मिळू  लागला आहे. बातम्या मिळण्याचे अनेक स्रोत सध्या उपलब्ध आहेत, पण वृत्तपत्र हे जवळचे आणि विश्वासार्ह वाटते.- विनायकदादा पाटील, माजी मंत्री---------------------सध्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र पुनश्च सुरू होणे ही दिलासादायक बाब आहे. वृत्तपत्रांमुळे परिसरातील तसेच संपूर्ण विश्वातील घटना, घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळते. वृत्तपत्र सामान्य नागरिकांच्या जीवनातील माहितीचा महत्त्वाचा दुवा आहे. वृत्तपत्रांचे नियमितपणे सुरू होणे पुन्हा एकदा जगाशी जोडले जाण्यासारखे आहे.- नानासाहेब बोरस्ते, प्रभारी अध्यक्ष, सावाना-------------------वृत्तपत्र वाचनाने मिळणारी प्रत्येक माहिती अधिकृत आणि खात्रीशीर असल्याने त्याबाबतपुन्हा खात्री करून घेण्याची आवश्यकता उरत नाही. त्यामुळे वृत्तपत्र पुन्हा पूर्वीप्रमाणे वाचायला मिळू लागल्याने माहिती आणि ज्ञानाचा अखंड झरा पुन्हा एकदा वाहू लागला आहे. - डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ----------------------वृत्तपत्र वाचणे ही वर्षानुवर्षांची सवय बनलेली आहे. त्यामुळे वृत्तपत्र सुरू झाल्याने अत्यंत आनंदझाला. वृत्तपत्रे वाचताना डोळ्यांना किंवा हातांना श्रम पडत नाहीत. ती आपल्या सोयीनुसार घरातील सर्वांनाच वाचतायेत असल्याने पुन्हा एकदा वृत्तपत्र वाचनाचा मनमुराद आनंद घेत आहे. - रवींद्र ढवळे, ज्येष्ठ रंगकर्मी-------------------वृत्तपत्रे हीच सर्वाधिक विश्वासार्ह माहितीचा स्रोत असतात. त्यामुळे वृत्तपत्र सुरू होणे हा पुन्हा एकदा विश्वासार्ह माहिती हाती पडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग झाले. वृत्तपत्रातील बातमी खात्रीशीर असल्याने पुन्हा शहानिशा करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे वृत्तपत्र पुन्हा सुरू झाल्याचा मनस्वी आनंद वाटत आहे. - सुरेश गायधनी, रंगकर्मी

टॅग्स :Nashikनाशिक