शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

शासन प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका

By admin | Updated: April 13, 2015 01:40 IST

शासन प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका

नाशिक : समाजाच्या उन्नतीसाठी शासन असंख्य योजना राबवत असून, त्या लोकांपर्यंत पोहोचवताना लोकजागृतीचे महत्त्वाचे काम वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी करावे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे उपआयुक्त के. एन. गवळे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त शासन प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावरील कार्यशाळेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रा. अनंत येवलेकर, पत्रकार शैलेंद्र तनपुरे, माहिती उपसंचालक सतीश लळीत, शिक्षणक्रम समन्वयक श्रीकांत सोनवणे, आकाशवाणीचे शैलेश माळोदे, सहायक उपआयुक्त वंदना कोचुरे आदि उपस्थित होते.सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग हा समाजातील दुर्बल, मागास, पीडित व वंचित घटकांसाठी योजनांच्या माध्यमातून विकासाचे काम करीत आहे, असे सांगून गवळे म्हणाले की, शासनाची भूमिका अलीकडच्या काळात बदलली आहे. मंत्रालयापासून अगदी गावपातळीपर्यंत शासनाचे विविध विभागदेखील सामाजिक न्यायाच्या भूमिकेतूनच काम करीत आहे.पत्रकारांनी शासन आणि समाजातील समन्वयकाची भूमिका घ्यावी, असे माहिती उपसंचालक लळीत यांनी सांगितले. सध्याच्या युगात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माहितीची क्रांती होताना दिसते आहे. पण समाजाच्या उन्नतीसाठी माहितीच्या क्रांतीबरोबरच सामाजिक क्रांती होणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनादेखील वरपांगी काम मान्य नव्हते. त्या काळातदेखील राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक सुधारणा व सामाजिक स्वातंत्र्य मिळेल ते खरे स्वातंत्र्य असेल अशी त्यांची भूमिका होती, असे लळीत म्हणाले. यावेळी प्रा. अनंत येवलेकर, शैलेश माळोदे, श्रीकांत सोनवणे आदिंनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रीमती कोचुरे यांनी केले. कार्यशाळेला पत्रकार, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)