शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
12
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
13
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
14
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
15
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
16
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
17
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
18
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
19
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

ग्राहक तक्रार निवारण मंचची भूमिका महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:41 IST

महावितरणच्या सर्वसामान्य ग्राहकांच्या विद्युत संदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी विद्युत कायद्यानुसार त्रिसूत्री पद्धत तयार करण्यात आली असून यामध्ये परिमंडळनिहाय असलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

नाशिकरोड : महावितरणच्या सर्वसामान्य ग्राहकांच्या विद्युत संदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी विद्युत कायद्यानुसार त्रिसूत्री पद्धत तयार करण्यात आली असून यामध्ये परिमंडळनिहाय असलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मंचाने न्याय देताना कायद्यासोबत मानवी संवेदना जपून आपली भूमिका चोखपणे बजवावी असे प्रतिपादन महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांनी केले.एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र येथे महावितरणच्या ग्राहक तक्र ार निवारण मंचचे अध्यक्ष, सदस्य, सचिव व विधी अधिकारी यांच्याकरिता आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत काळम पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्युत लोकपाल दीपक लाड, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, मुख्य महाव्यवस्थापक भरत जाडकर, मुख्य विधी सल्लागार रमेश गांधी यांची उपस्थित होते.यावेळी बोलताना काळम पाटील म्हणाले की, मंडळ स्तरावरील अंतर्गत तक्रार निवारण कक्षाने सुद्धा ग्राहक तक्रारीचे निवारण गतीने करावे ग्राहकांच्या तक्रारी नीट समजून घेऊन दोन्ही बाजू विचारात घेताना संवेदना सुद्धा कायम ठेवल्या पाहिजे. मात्र भावनेच्या आहारी न जाता कंपनी व ग्राहक हित जोपासत न्याय करण्याचे आवाहन काळम पाटील यांनी केले.महावितरणमधील प्रत्येक घटकाने सदविवेक बुद्धीचा वापर करून न्याय द्यावा, तसेच ग्राहकाचे हित जोपासताना कंपनीचे नुकसान होणार नाही यामधील समन्वय साधण्याचे मत मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर यांनी व्यक्त केले.मुख्य विधी सल्लागार रमेश गांधी यांनी प्रास्ताविकातून पिहल्यांदाच अशा प्रकारची सर्व समावेशक कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून ग्राहकाला योग्य व तत्पर न्याय देण्यासाठी यंत्रणांचे समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विधी अधिकारी आपली भूमिका योग्यपणे बजावीत असून या कार्यशाळेतून मिळालेली माहिती उपस्थितांनी इतरांपर्यंत पोहचावी, असे आवाहन गांधी यांनी केले.कार्यशाळेला राज्यभरातील महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष, सदस्य, सचिव व विधी अधिकारी तसेच प्रशिक्षण केंद्राचे सहायक महाव्यवस्थापक पांडुरंग वेळापुरे, कार्यकारी अभियंते देवेंद्र सायनेकर, अनिल नागरे, नरेंद्र सोनवणे, भाऊसाहेब पाटील आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संगणकीय सादरीकरणाद्वारे माहितीविद्युत लोकपाल दीपक लाड यांनी, कार्यशाळेच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबविला असून या माध्यमातून सर्वच घटक चांगली माहिती, विचार, कल्पना यांची आदान प्रदान होऊन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर संगणकीय सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

टॅग्स :consumerग्राहकelectricityवीज