शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

रोहयोच्या मजुरीत फक्त २ रुपये वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:05 IST

१ एप्रिलपासून शासनाने ही वाढ लागू केली असून, यापूर्वी अकुशल कामगारांना २०१ रुपये इतकी मजुरी मिळत होती. मजुरीत वाढ करण्यामागे ठोस असे कारण नसले तरी, दरवर्षी शासन एप्रिल महिन्यात तशी वाढ करीत असल्याचे सांगण्यात आले. मुळात रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्वी केल्या जात असलेल्या रस्ते

ठळक मुद्देमजुरांची थट्टा : राज्य सरकारचा निर्णय आता मजुरांना दररोज २०३ रुपये मजुरी मिळणार आहे.

नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची कमालीची भाववाढ, महागाईने गाठलेला कळस, इंधन दरवाढीत होणारी होरपळ लक्षात घेता सर्वत्र सरकारविरुद्ध असंतोष व्यक्त केला जात असताना राज्य सरकारने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या अकुशल कामगारांच्या मजुरीत फक्त २ रुपयांनी वाढ करून मजुरांची थट्टा केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रोहयोच्या मजुरीत वाढ करण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला असताना गेल्या वर्षाच्या तुलनेत फक्त २ रुपये वाढ झाल्याने आता मजुरांना दररोज २०३ रुपये मजुरी मिळणार आहे.१ एप्रिलपासून शासनाने ही वाढ लागू केली असून, यापूर्वी अकुशल कामगारांना २०१ रुपये इतकी मजुरी मिळत होती. मजुरीत वाढ करण्यामागे ठोस असे कारण नसले तरी, दरवर्षी शासन एप्रिल महिन्यात तशी वाढ करीत असल्याचे सांगण्यात आले. मुळात रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्वी केल्या जात असलेल्या रस्ते, तलाव, बंधारे, जमीन सपाटीकरण आदी कामे केली जात होती व गावातील मजुरांना गावातच रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना महाराष्टÑात यशस्वी ठरली होती. मजुरीच्या मोबदल्यात मजुरांना अन्नधान्य देण्याचीदेखील तरतूद यात करण्यात आली होती. ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी यशस्वी ठरलेली ही योजना केंद्र सरकारने स्वीकारून संपूर्ण देशपातळीवर ती लागू केली असून, अनेक मागास राज्यांनी या योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे करून घेतली आहेत. परंतु महाराष्टÑातील विदर्भाचा काही भाग सोडल्यास रोहयोच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे. दिवसभर काम करून रोहयोतून मिळणाºया मजुरीतून दोन वेळचे पोट भरत नसल्याची वाढत चाललेली भावना व त्यामानाने मोलमजुरीत तसेच शेतीकामात मिळणारी मजुरी अधिक असल्यामुळे रोहयोच्या कामांमध्ये मजुरांअभावी कमालीची घट झाली. परिणामी घरकुल योजना, शौचालय व विहीर बांधकाम अशी व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठीच मजूर कामे करू लागले आहेत. महागाईच्या तुलनेत रोहयो मजुरांना मिळणाºया मजुरीचा विचार करता राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना समितीने सन २०१४-१५ मध्ये मजुरांना किमान ३०० रुपये मजुरी मिळावी, अशी शिफारस केली होती. परंतु सरकारने या शिफारशीकडे दुर्लक्ष करून सन २०१७-१८ मध्ये २०१ रुपये व आता २०१८-१९ मध्ये २०३ रुपये मजुरीत वाढ केली आहे. सरकारची ही कृती म्हणजे मजुरांची थट्टाच असल्याची टीका केली जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक