शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

रोहयोच्या मजुरीत फक्त २ रुपये वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:05 IST

१ एप्रिलपासून शासनाने ही वाढ लागू केली असून, यापूर्वी अकुशल कामगारांना २०१ रुपये इतकी मजुरी मिळत होती. मजुरीत वाढ करण्यामागे ठोस असे कारण नसले तरी, दरवर्षी शासन एप्रिल महिन्यात तशी वाढ करीत असल्याचे सांगण्यात आले. मुळात रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्वी केल्या जात असलेल्या रस्ते

ठळक मुद्देमजुरांची थट्टा : राज्य सरकारचा निर्णय आता मजुरांना दररोज २०३ रुपये मजुरी मिळणार आहे.

नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची कमालीची भाववाढ, महागाईने गाठलेला कळस, इंधन दरवाढीत होणारी होरपळ लक्षात घेता सर्वत्र सरकारविरुद्ध असंतोष व्यक्त केला जात असताना राज्य सरकारने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या अकुशल कामगारांच्या मजुरीत फक्त २ रुपयांनी वाढ करून मजुरांची थट्टा केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रोहयोच्या मजुरीत वाढ करण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला असताना गेल्या वर्षाच्या तुलनेत फक्त २ रुपये वाढ झाल्याने आता मजुरांना दररोज २०३ रुपये मजुरी मिळणार आहे.१ एप्रिलपासून शासनाने ही वाढ लागू केली असून, यापूर्वी अकुशल कामगारांना २०१ रुपये इतकी मजुरी मिळत होती. मजुरीत वाढ करण्यामागे ठोस असे कारण नसले तरी, दरवर्षी शासन एप्रिल महिन्यात तशी वाढ करीत असल्याचे सांगण्यात आले. मुळात रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्वी केल्या जात असलेल्या रस्ते, तलाव, बंधारे, जमीन सपाटीकरण आदी कामे केली जात होती व गावातील मजुरांना गावातच रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना महाराष्टÑात यशस्वी ठरली होती. मजुरीच्या मोबदल्यात मजुरांना अन्नधान्य देण्याचीदेखील तरतूद यात करण्यात आली होती. ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी यशस्वी ठरलेली ही योजना केंद्र सरकारने स्वीकारून संपूर्ण देशपातळीवर ती लागू केली असून, अनेक मागास राज्यांनी या योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे करून घेतली आहेत. परंतु महाराष्टÑातील विदर्भाचा काही भाग सोडल्यास रोहयोच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे. दिवसभर काम करून रोहयोतून मिळणाºया मजुरीतून दोन वेळचे पोट भरत नसल्याची वाढत चाललेली भावना व त्यामानाने मोलमजुरीत तसेच शेतीकामात मिळणारी मजुरी अधिक असल्यामुळे रोहयोच्या कामांमध्ये मजुरांअभावी कमालीची घट झाली. परिणामी घरकुल योजना, शौचालय व विहीर बांधकाम अशी व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठीच मजूर कामे करू लागले आहेत. महागाईच्या तुलनेत रोहयो मजुरांना मिळणाºया मजुरीचा विचार करता राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना समितीने सन २०१४-१५ मध्ये मजुरांना किमान ३०० रुपये मजुरी मिळावी, अशी शिफारस केली होती. परंतु सरकारने या शिफारशीकडे दुर्लक्ष करून सन २०१७-१८ मध्ये २०१ रुपये व आता २०१८-१९ मध्ये २०३ रुपये मजुरीत वाढ केली आहे. सरकारची ही कृती म्हणजे मजुरांची थट्टाच असल्याची टीका केली जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक