शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रोहयोच्या मजुरीत फक्त २ रुपये वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:05 IST

१ एप्रिलपासून शासनाने ही वाढ लागू केली असून, यापूर्वी अकुशल कामगारांना २०१ रुपये इतकी मजुरी मिळत होती. मजुरीत वाढ करण्यामागे ठोस असे कारण नसले तरी, दरवर्षी शासन एप्रिल महिन्यात तशी वाढ करीत असल्याचे सांगण्यात आले. मुळात रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्वी केल्या जात असलेल्या रस्ते

ठळक मुद्देमजुरांची थट्टा : राज्य सरकारचा निर्णय आता मजुरांना दररोज २०३ रुपये मजुरी मिळणार आहे.

नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची कमालीची भाववाढ, महागाईने गाठलेला कळस, इंधन दरवाढीत होणारी होरपळ लक्षात घेता सर्वत्र सरकारविरुद्ध असंतोष व्यक्त केला जात असताना राज्य सरकारने महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या अकुशल कामगारांच्या मजुरीत फक्त २ रुपयांनी वाढ करून मजुरांची थट्टा केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रोहयोच्या मजुरीत वाढ करण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला असताना गेल्या वर्षाच्या तुलनेत फक्त २ रुपये वाढ झाल्याने आता मजुरांना दररोज २०३ रुपये मजुरी मिळणार आहे.१ एप्रिलपासून शासनाने ही वाढ लागू केली असून, यापूर्वी अकुशल कामगारांना २०१ रुपये इतकी मजुरी मिळत होती. मजुरीत वाढ करण्यामागे ठोस असे कारण नसले तरी, दरवर्षी शासन एप्रिल महिन्यात तशी वाढ करीत असल्याचे सांगण्यात आले. मुळात रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्वी केल्या जात असलेल्या रस्ते, तलाव, बंधारे, जमीन सपाटीकरण आदी कामे केली जात होती व गावातील मजुरांना गावातच रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना महाराष्टÑात यशस्वी ठरली होती. मजुरीच्या मोबदल्यात मजुरांना अन्नधान्य देण्याचीदेखील तरतूद यात करण्यात आली होती. ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी यशस्वी ठरलेली ही योजना केंद्र सरकारने स्वीकारून संपूर्ण देशपातळीवर ती लागू केली असून, अनेक मागास राज्यांनी या योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे करून घेतली आहेत. परंतु महाराष्टÑातील विदर्भाचा काही भाग सोडल्यास रोहयोच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे. दिवसभर काम करून रोहयोतून मिळणाºया मजुरीतून दोन वेळचे पोट भरत नसल्याची वाढत चाललेली भावना व त्यामानाने मोलमजुरीत तसेच शेतीकामात मिळणारी मजुरी अधिक असल्यामुळे रोहयोच्या कामांमध्ये मजुरांअभावी कमालीची घट झाली. परिणामी घरकुल योजना, शौचालय व विहीर बांधकाम अशी व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठीच मजूर कामे करू लागले आहेत. महागाईच्या तुलनेत रोहयो मजुरांना मिळणाºया मजुरीचा विचार करता राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना समितीने सन २०१४-१५ मध्ये मजुरांना किमान ३०० रुपये मजुरी मिळावी, अशी शिफारस केली होती. परंतु सरकारने या शिफारशीकडे दुर्लक्ष करून सन २०१७-१८ मध्ये २०१ रुपये व आता २०१८-१९ मध्ये २०३ रुपये मजुरीत वाढ केली आहे. सरकारची ही कृती म्हणजे मजुरांची थट्टाच असल्याची टीका केली जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक