शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

रस्ता कामाचे पितळ उघड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:46 IST

बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जा । ठेकेदाराच्या चौकशीची ग्रामस्थांकडून मागणी

रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे आलेले तलावाचे स्वरूप.जोरण : बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा झालेल्या पावसामुळे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.ठेकेदाराने कोणतेही शासकीय मापदंड न पाळत रस्ता बनविला असून, रस्त्याला पाणी निचरा होण्यासाठी योग्य उतार न दिल्याने बऱ्याच ठिकाणी पाणी साचून रस्ता उखडला आहे. तर साचलेल्या पाण्यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप आले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी झालेला खर्च पाण्यात गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. शासकीय निधी वाया गेल्याने संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश घोडे यांनी एका निवेदनाद्वारे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे केली आहे.भाक्षी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शरदनगर परिसरात जिल्हा परिषदेच्या मूलभूत सुविधा अंतर्गत या भागातील रस्ता करण्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता.या योजनेंतर्गत या परिसरात तीन महिन्यांपूर्वी रस्ता कॉँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, झालेल्या पावसात या कामाचा दर्जा उघडकीस आला आहे.आम्ही राहत असलेल्या परिसरात करण्यात आलेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. कोणतेही शासकीय मापदंड न पाळल्याने या रस्त्यावर पाणी साचते. यामुळे या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, संबंधित कामाची चौकशी व्हावी.- राकेश घोडे,सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा