शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

साकोरे गावाजवळील बेहडी नदीपात्रातील रस्ता गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 19:22 IST

कळवण : शुक्र वारी रात्री कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, दळवट व जयदर परिसरात व चणकापूर, पुनंद प्रकल्प व लघुपाटबंधारे प्रकल्प लाभक्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चणकापूर व पुनंद प्रकल्पातून नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे. सप्तशृंगगड परिसरातील पावसामुळे मार्कंडपिंप्री लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने बेहडी नदी व नाल्यांना ...

कळवण : शुक्र वारी रात्री कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, दळवट व जयदर परिसरात व चणकापूर, पुनंद प्रकल्प व लघुपाटबंधारे प्रकल्प लाभक्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चणकापूर व पुनंद प्रकल्पातून नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे. सप्तशृंगगड परिसरातील पावसामुळे मार्कंडपिंप्री लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने बेहडी नदी व नाल्यांना पूर आल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.बेहडी नदीवरील साकोरे गावाजवळील सीमेंट बंधाऱ्याचा भरावासह शेतकºयांनी श्रमदानातून केलेला साकोरे येथील रस्ता वाहून गेल्याने साकोरे येथील ५० शेतकºयांचा गावाशी संपर्कतुटला आहे. रस्ता नसल्याने नदीपलीकडील शेतकºयांचा शेकडो क्विंटल कांदा व शेतमाल शेतात अडकून पडणार आहे.चणकापूरमधून २१७२ क्यूसेक व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून ४५० ते ५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, चणकापूर उजव्या कालव्याला १०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. गोबापूर, नांदुरी, बोरदैवत, धार्डेदिगर, मळगाव चिंचपाडा, भांडणे, खिराड, मार्कंडपिंप्री, धनोली,भेगू, जामलेवणी, ओतूर आदी लघुपाटबंधारे प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला असून, पूरपाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याने कळवण तालुक्यात गिरणा, पुनंद, बेहडी, तांबडी नदीला पूर आला आहे. गिरणा काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.साकोरे येथील बंधाºयाचा भराव वाहून गेल्याने या बंधाºयाच्या खाली साकोरे येथील ५० शेतकºयांनी श्रमदानातून तयार केलेला रस्ता वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतमाल घेऊन जाणे अवघड झाले आहे. साकोरे येथील महादेव मंदिराकडील रस्ता पुरामुळे वाहून गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. साकोरे गावाशी संपर्कसाधण्यासाठी व शेतात येणे व जाण्यासाठी नदीपलीकडील ५० शेतकºयांचा आता शिरसमणीमार्गे पायपीट करावी लागणार आहे.शेतमाल व कांदा बाहेर काढायला रस्ता नसल्याने नदीपलीकडील शेतकºयांचा प्रत्येकी १० ट्रॅक्टर कांदा शेतात अडकून पडणार असल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. शिवाय मिरची, टमाटे, घेवडा आदी पिकांसह जनावरे नदीपलीकडे अडकून पडणार आहे. साकोरे येथील गोरख देवरे, आशुतोष आहेर , संदीप आहेर, रमेश आहेर, अभिमन्यू आहेर, सुभाष आहेर, राजाराम देवरे, दौलत आहेर, पोपट आहेर, माणिक देवरे, रामचंद्र देवरे, पंडित देवरे, दादा देवरे, कैलास आहेर, अनिल पवार, राजाराम आहेर, सुरेश आहेर, श्रावण वाघ, रवींद्र पवार, जिभाऊ वाघ, बापू पवार, मंगळू माळी, मोहन पवार, जयराम पवार, शिवदास पवार, शांताराम पवार, पिंटू माळी, कडू आहेर यांच्यासह अनेक शेतक-यांचा कांदा शेतात अडकून पडला आहे. 

 

 

टॅग्स :Rainपाऊस