शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:38 IST

सिन्नर : येथील मविप्र संचलित अभिनव बालविकास मंदिर व सिन्नर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून ३० व्या रस्ता सुरक्षा अभियान २०१९ अंतर्गत शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देरस्त्यांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सिन्नर : येथील मविप्र संचलित अभिनव बालविकास मंदिर व सिन्नर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून ३० व्या रस्ता सुरक्षा अभियान २०१९ अंतर्गत शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.आपल्या देशात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत आहे. रस्ते अपघातात लाखो लोक आपले हात, पाय व शरीराचे अवयव गमावून बसतात. या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या ८० टक्के लोकांचे वयमान हे सुमारे १८ ते ३० गटातील असते. राज्यातील तरुण मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात अपघातात नष्ट होत असेल तर राज्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे, असे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले. रस्त्यांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात शहरात, गावागावात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पोलीस हवालदार शहाजी शिंदे, राजेश काकड, समाधान बोराडे, मुख्याध्यापक संगीता आव्हाड, भाऊसाहेब कहांडळ, उपमुख्याध्यापक संजय लोहकरे, संजय गांगुर्डे, सुजोत कुमावत, सविता दवंगे, संगीता गाडे, सरला वर्पे, विकास गिते, रवींद्र बुचकुल, नितेश दातीर, मीनाक्षी ठाकरे, वैभव केदार, विजय सावंत, ज्योती शिंदे, वृषाली खताळ, संगीता जाधव, सुरेखा भोर, शर्मिला देवरे, सरला गिते, श्रीकांत नवले, योगेश घुले आदी उपस्थित होते.हेल्मेट घाला, अपघात टाळाया उपक्रमाद्वारे पाचशे विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून सिन्नर शहरात सुरक्षित रस्ते प्रवासासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. रस्ता सुरक्षा सप्ताह रॅली शाळेच्या प्रांगणातून काढण्यात आली. ‘हेल्मेट घाला अपघात टाळा,’ ‘जीवन सुरक्षित, तर परिवार सुरक्षित’ असे घोषवाक्ये लिहिलेली फलके हातात घेऊन विद्यार्थ्यांनी भैरवनाथ मंदिर, खासदार पूल, बाजारवेस, लाल चौक, शिंपी गल्ली, नवापूर, गावठा या मार्गाने जात जनजागृती केली.