शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

मार्ग प्रगतीचा : तब्बल १२ हजार कोटींच्या राष्टÑीय महामार्ग प्रकल्पातील पहिला टप्पा सुरत ते नगर सागरमाला प्रकल्पातील महामार्ग जाणार नाशिकमधून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:09 IST

नाशिक : केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वतीने १२ हजार कोटींच्या सागरमाला प्रकल्पातील ४२१ किलोमीटरचा राष्टÑीय महामार्गाचा पहिला टप्पा सुरत ते नगर असा निश्चित करण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले.

नाशिक : केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वतीने १२ हजार कोटींच्या सागरमाला प्रकल्पातील ४२१ किलोमीटरचा राष्टÑीय महामार्गाचा पहिला टप्पा सुरत ते नगर असा निश्चित करण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यासाठीच्या मार्गाचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, भूसंपादन प्रक्रियेला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील काही भाग दिंडोरी तालुक्यासह ओझर, आडगाव येथील मुंबई -गोवा महामार्गावरून निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा या तालुक्यांमधून जाणार आहे.केंद्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, भारत सरकारचा एक व्यूहात्मक पुढाकार आहे. त्याचा उद्देश समुद्री बंदरांचे आधुनिकीकरण करणे असा आहे. भारताच्या विकासामध्ये समुद्रीकिनाऱ्यांचे अधिकाधिक योगदान मिळवण्याच्या प्रयत्नांचा तो भाग आहे. त्याद्वारे सध्या अस्तित्वात असलेल्या समुद्री बंदरांचा जागतिक दर्जाच्या बंदरात विकास करण्यासह बंदरांचा,औद्योगिक क्षेत्राचा आणि त्यासाठी दोन टोकांना जोडणाºया महामार्गाचा एकात्मिक विकास करणे असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. बंदरात आलेला माल वेगवेगळ्या महामार्गांनी सर्वदूर पाठवणे सहजसुलभ व्हावे, असादेखील या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यासाठी भारतातील १२ बंदरे व १२०८ बेटे विकसित करण्यास केंद्र शासनाने पूर्वीच परवानगी दिली असून, सर्व बंदरांना महामार्गाद्वारे जोडण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत २०२५ सालापर्यंत एकूण ३५ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे बांधकाम करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्र मानंतरचा हा देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे.या प्रकल्पासाठी ‘सागरमाला विकास कंपनी लिमिटेड’ या कंपनीची निर्मिती करण्यात आली असून, त्याअंतर्गतच या महाकाय प्रकल्पाची रुपरेषा आखून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा सागरमाला महामार्ग सुरतहून निघाल्यावर नाशिक, नगर पुढे पुणे, सोलापूर जिल्ह्णातून आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूत दक्षिणेकडील समुद्रतटाला जाऊन मिळणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत-मुंबईदरम्यानची वाहतूक तसेच मुंबई-पुणेदरम्यानच्या अवजड मालवाहतुकीला काही प्रमाणात आळा घालणेदेखील शक्य होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक