शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात रस्त्यांची दैना, घाटमाथ्यावर दरडींचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:18 IST

वसंत तिवडे, त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पेठ, इगतपुरी व नाशिक तालुक्यातील काही गावे सामील करण्यात आले आहेत. तिन्ही तालुक्यातील ...

वसंत तिवडे, त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पेठ, इगतपुरी व नाशिक तालुक्यातील काही गावे सामील करण्यात आले आहेत. तिन्ही तालुक्यातील काही गावे मिळून त्र्यंबकेश्वर तालुका निर्माण झाला असला तरी दोन वर्षांपूर्वी नव्याने करण्यात आलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था आज रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते अशी झाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० ए, राज्य महामार्ग क्र. ३०, राज्य महामार्ग क्र. २१ व अनेक क्रमांकाचे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. या प्रमुख जिल्हा मार्गांची अवस्था अतिशय वाईट झाली असून, त्यातील असंख्य रस्त्यांची अवस्था चाळणीगत झाली आहे. प्रमुख जिल्हा मार्ग तथा ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेचा इमारत व दळणवळण विभाग पाहतो, तर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत नाशिक त्र्यंबक रस्ता सोडला, तर नाशिक - हरसूल, त्र्यंबक - हरसूल यामध्ये वाघेरा, देवरगाव, तुपादेवी, रोहिले ते देवरगाव फाटा, पहिने ते देवगाव घोटी या परिसरातील दोन गावांना जोडणारे जि. प.चे रस्ते तसेच तळेगाव अंजनेरी ते जातेगाव पिंपळद ते राजूर आठवा मैल अर्थात नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हे रस्ते अतिशय खराब झाले आहेत. हे रस्ते मागच्याच वर्षी मंजूर झाले होते. रस्त्यांना निधीही आला होता. पण सन २०२० हे वर्ष कोरोनाचे वर्ष असल्याने एक वर्षभर कोणतीच विकासकामे करायची नसल्याने सर्व कामांचा विकासनिधी कोरोनावर खर्च करावा लागला. त्यामुळेच मागच्या वर्षी एकही विकासात्मक काम झाले नाही. परिणामी विकासात एक वर्षभर मागे गेलो. आज तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, हरसूल भागातील अनेक रस्त्यांवर दरडी पडलेल्या आहेत. पण वाहन जाण्यापुरती माती जेसीबीने बाजुला करुन रस्ते मोकळे करून काम भागवले जात आहे. आमदारांवर अवलंबून राहण्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सभापती रस्ते व अन्य विकासात्मक कामे करून घेतात. पण, मागच्या वर्षी अशी कोणतीच विकासात्मक कामे न झाल्याने रस्ते दुरुस्ती अथवा नवीन रस्त्यांची कामे केली गेली नाहीत. त्यामुळेच आज रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. पावसाळ्यात तर दैना झाली आहेे. मात्र, प्रशासन तात्पुरत्या डागडुजीवर भर देते, कायमस्वरुपी या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल केला जात आहे.

इन्फो

आदिवासी पाड्यांवरील रस्त्यांची दैना

तालुक्यात आळीवमाळ फाटा ते घोटबारी खंडी फाटा ते बेज करंजपाडा, नांगरबारी वळण, वरपेचा पाडा, खंडी पाडा, उंबरघोडा ते नांगरबारी रस्ता तसेच मुरंबी ते भागओहळ कोटंबी ते रायते गडदुणे, आडगाव, बलदापाडा ते बारीमाळ, करंज पाडा, बारीमाळ ते सावरपाडा, बेज बारीबारीमाळ ते ओझरखेड, शिरसगाव, शेंब्याची बारी, भुतमोखाडा, ठाणापाडा ते दावले श्वरकडे जाणारे रस्ते खराब असून ठाणापाडा परिसरातील रस्त्यांवर दरडी मोठ्या प्रमाणावर पडल्या आहेत. जेसीबीच्या सहाय्याने दोन गाड्या जाण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. याशिवाय रायते भासवडपाडा ते बालापाडा येथील रस्त्यावरील दरडी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी तर मोठमोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नाही. पर्यायाने अपघात घडतात.

फोटो- १९ त्र्यंबक खबरबात

घाटमाथ्यावरील रस्त्यांवर कोसळलेल्या दरडी.

190821\19nsk_28_19082021_13.jpg

फोटो- १९ त्र्यंबक खबरबातघाटमाथ्यावरील रस्त्यांवर कोसळलेल्या दरडी.