शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात रस्त्यांची दैना, घाटमाथ्यावर दरडींचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:18 IST

वसंत तिवडे, त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पेठ, इगतपुरी व नाशिक तालुक्यातील काही गावे सामील करण्यात आले आहेत. तिन्ही तालुक्यातील ...

वसंत तिवडे, त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पेठ, इगतपुरी व नाशिक तालुक्यातील काही गावे सामील करण्यात आले आहेत. तिन्ही तालुक्यातील काही गावे मिळून त्र्यंबकेश्वर तालुका निर्माण झाला असला तरी दोन वर्षांपूर्वी नव्याने करण्यात आलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था आज रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ते अशी झाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० ए, राज्य महामार्ग क्र. ३०, राज्य महामार्ग क्र. २१ व अनेक क्रमांकाचे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. या प्रमुख जिल्हा मार्गांची अवस्था अतिशय वाईट झाली असून, त्यातील असंख्य रस्त्यांची अवस्था चाळणीगत झाली आहे. प्रमुख जिल्हा मार्ग तथा ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेचा इमारत व दळणवळण विभाग पाहतो, तर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत नाशिक त्र्यंबक रस्ता सोडला, तर नाशिक - हरसूल, त्र्यंबक - हरसूल यामध्ये वाघेरा, देवरगाव, तुपादेवी, रोहिले ते देवरगाव फाटा, पहिने ते देवगाव घोटी या परिसरातील दोन गावांना जोडणारे जि. प.चे रस्ते तसेच तळेगाव अंजनेरी ते जातेगाव पिंपळद ते राजूर आठवा मैल अर्थात नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हे रस्ते अतिशय खराब झाले आहेत. हे रस्ते मागच्याच वर्षी मंजूर झाले होते. रस्त्यांना निधीही आला होता. पण सन २०२० हे वर्ष कोरोनाचे वर्ष असल्याने एक वर्षभर कोणतीच विकासकामे करायची नसल्याने सर्व कामांचा विकासनिधी कोरोनावर खर्च करावा लागला. त्यामुळेच मागच्या वर्षी एकही विकासात्मक काम झाले नाही. परिणामी विकासात एक वर्षभर मागे गेलो. आज तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, हरसूल भागातील अनेक रस्त्यांवर दरडी पडलेल्या आहेत. पण वाहन जाण्यापुरती माती जेसीबीने बाजुला करुन रस्ते मोकळे करून काम भागवले जात आहे. आमदारांवर अवलंबून राहण्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सभापती रस्ते व अन्य विकासात्मक कामे करून घेतात. पण, मागच्या वर्षी अशी कोणतीच विकासात्मक कामे न झाल्याने रस्ते दुरुस्ती अथवा नवीन रस्त्यांची कामे केली गेली नाहीत. त्यामुळेच आज रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. पावसाळ्यात तर दैना झाली आहेे. मात्र, प्रशासन तात्पुरत्या डागडुजीवर भर देते, कायमस्वरुपी या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल केला जात आहे.

इन्फो

आदिवासी पाड्यांवरील रस्त्यांची दैना

तालुक्यात आळीवमाळ फाटा ते घोटबारी खंडी फाटा ते बेज करंजपाडा, नांगरबारी वळण, वरपेचा पाडा, खंडी पाडा, उंबरघोडा ते नांगरबारी रस्ता तसेच मुरंबी ते भागओहळ कोटंबी ते रायते गडदुणे, आडगाव, बलदापाडा ते बारीमाळ, करंज पाडा, बारीमाळ ते सावरपाडा, बेज बारीबारीमाळ ते ओझरखेड, शिरसगाव, शेंब्याची बारी, भुतमोखाडा, ठाणापाडा ते दावले श्वरकडे जाणारे रस्ते खराब असून ठाणापाडा परिसरातील रस्त्यांवर दरडी मोठ्या प्रमाणावर पडल्या आहेत. जेसीबीच्या सहाय्याने दोन गाड्या जाण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. याशिवाय रायते भासवडपाडा ते बालापाडा येथील रस्त्यावरील दरडी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी तर मोठमोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नाही. पर्यायाने अपघात घडतात.

फोटो- १९ त्र्यंबक खबरबात

घाटमाथ्यावरील रस्त्यांवर कोसळलेल्या दरडी.

190821\19nsk_28_19082021_13.jpg

फोटो- १९ त्र्यंबक खबरबातघाटमाथ्यावरील रस्त्यांवर कोसळलेल्या दरडी.