शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

बाऱ्हे घाटात रस्ता खचला; दुरुस्ती सुरू

By admin | Updated: August 8, 2016 00:12 IST

बाऱ्हे घाटात रस्ता खचला; दुरुस्ती सुरू

दिंडोरी : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ननाशीसह परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ननाशी ते बाऱ्हे रस्त्यावर ननाशी नजीक घाटात एका अवघड वळणावर साइडपट्टी व रस्ता पावसामुळे खचला आहे. या ठिकाणी रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. या ठिकाणी रस्ता देखील अरु ंद आहे वाहनांच्या दृष्टीने हे वळण धोकेदायक बनले आहे. पावसाळ्यात या घाटात मोठ्या प्रमाणावर धुके येत असते. रात्रीच्य वेळी एखाद्या मोठया व अवजड वाहनाच्या चालकाला रस्त्यावरील भगदाड लक्षात आले नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. ज्या बाजूने रस्ता खचला आहे तेथे खाली अंदाजे ५० ते ७५ फूट खोल दरी आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास कळविल्यानंतर उपअभियंता शेखर मराठे अभियंता अर्जुन गोसावी यांनी भेट देत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.ननाशीसह परिसरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे परिसरातील सर्व पाझर तलाव, वळण बंधारे, नदी- नाले ओव्हरफ्लो झाले आहेत.तलावांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या परिसरात भात, नागली, वरई आदी पिकांच्या लावणीची कामे वेगात सुरु असतांना मुसळधार पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी लावणी केलेले भात पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहेत. नागली, वरईची रोपे देखील पुरात वाहून गेली आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांची भात, नागली, वरई इत्यादि महत्त्वाची पिके असतात. या पिकांच्या उत्पादनावर आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ठरते. याच पिकांना पावसाचा जबर फटका बसल्याने आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान या आपत्कालीन परिस्थितीत कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आदि प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)