शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

म्हैसवळण घाटातील रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 16:41 IST

धोकादायक : दोन जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला

ठळक मुद्देखचलेल्या रस्त्याच्या खालच्या बाजूला दोनशे ते तीनशे अदिवासींची लोकवस्ती असलेल्या चौरेवाडी येथील ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नगर-नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणारा मुख्य म्हैसवळण घाट रस्ता खचून या दोन्ही जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. खचलेल्या रस्त्याच्या खालच्या बाजूला दोनशे ते तीनशे अदिवासींची लोकवस्ती असलेल्या चौरेवाडी येथील ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे.याच परिसरातील भरविर-निनावी हा रस्ताही खचून पूर्णपणे पाण्यात वाहून गेला आहे, रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या भात लागवड केलेल्या जमिनी वाहून गेल्या आहेत. परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या शेतातील बांध तुटले, अनेकांच्या विहिरी बुजल्या तसेच शेतीवरील वीज मिटरमध्ये पाणी जाऊन यंत्रणा बंद पडली आहे. भातशेतीची वाताहत झालेली असतांना देखील या परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे स्थानिक प्रशासनाकडून अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. या सर्व परिस्थितीची पाहणी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी नुकतीच केली व शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचेसह खेड गटाचे गटनेते महेश गाढवे,अडसरे येथील सरपंच संतु साबळे,सरपंच परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष डॉ.श्रीराम लहामटे,सामाजिक कार्यकर्ते सुनील महाले, तुषार शिंदे, केशव बांबळे, दिलीप बांबळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक