शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निवडणुकीचा वाढे ज्वर, वादांचा हाेई कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीच्या वाढत्या ज्वराचे परिणाम सोमवारी झालेल्या महासभेत उमटताना दिसले. सिडकोतील उड्डाणपूल महापौरांनी रोखल्याच्या शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर ...

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीच्या वाढत्या ज्वराचे परिणाम सोमवारी झालेल्या महासभेत उमटताना दिसले. सिडकोतील उड्डाणपूल महापौरांनी रोखल्याच्या शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांच्या आरोपांवर होय अन्य नगरसेवकांची कामे व्हावीत यासाठी मीच उड्डाणपूल रोखला असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, तर त्यांना बडगुजर यांनीदेखील खुले आव्हान दिले. दुसरीकडे भाजपचे संभाजी मोरूस्कर यांनी महासभेत सोयीचेच ऐकण्याची व्यवस्था असल्याचे सांगून घरचा आहेर दिला, तर बग्गा यांच्याशी महापौरांचे खटके उडाले.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका तोंडावर आल्या असून, त्यामुळे आता राजकीय पक्षांमध्ये खटके उडताना दिसत आहेत. सोमवारी (दि. ३१) महासभेत त्याचे परिणाम दिसले. महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद असताना सिडकोतील अडीचशे कोटी रुपयांचा उड्डाणपूल महापौर सतीश कुलकर्णी यांनी पत्र देऊन थांबविला, तर दुसरीकडे तरतूद नसताना भूसंपादनासाठी जास्त रक्कम प्रशासनाने कशी काय खर्च केली असा प्रश्न सुधाकर बडगुजर यांनी केला. त्यावर महापौरांनी होय मीच उड्डाणपुलाचे काम रोखण्यासाठी पत्र दिले असे सांगितलेे. शहरातील सामान्य नगरसेवकांच्या प्रभागात कामे हेात नाहीत. आयुक्तांना नागरी कामांसाठी कर्ज काढण्यास सांगितले तर ते कर्ज काढत नाही, अशावेळी एकाच प्रभागात अडीचशे कोटींंचा एक पूल करून अन्य नगरसेवकांची कामे का थांबवायची, असा प्रश्न त्यांनी केला. महापौरांना सर्वांना समान न्याय द्यावा लागतो, असेही ते म्हणाले. यावर बडगुजर यांनी उड्डाणपूल थांबवून तर दाखवा, मी तुम्हाला आव्हान देतो, असे सांगितल्यावर महापौरांनी आपणच यापूर्वी पुलासाठी आग्रह धरला. परंतु आता अन्य नगरसेवकांची कामे व्हावीत, मग पूल व्हावा, अशी भूमिका घेतली. पूल होऊच नये अशी भूमिका कधीच घेतली नसल्याचे ते म्हणाले.

भाजपचे संभाजी मोरूस्कर ऑनलाईन महासभेत बराच वेळ बोलत असल्याने आणि त्यांचे म्हणणे ऐकू येत नसल्याने महापौरांनी त्यांना तसे सांगितल्यावर मोरूस्कर यांनीही सोयीचेच ऐकण्याची व्यवस्था केल्याचा आरोप केला.

इन्फो..

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाशी सलग्न वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन देण्याच्या प्रस्तावावर बोलताना गजानन शेलार, विलास शिंदे तसेच गुरूमित बग्गा यांनीही राज्य सरकारचे अभिनंदन केले पाहिजे असे सांगितल्यावर महापौरांनी देखील अगोदरच्या फडणवीस सरकारनेच मूळ प्रस्ताव मंजूर केला होता असे सांगितले, तर अशाच एका विषयावार बडगुजर यांच्याशी बोलताना राज्य सरकारने काय दिले आणि किती विषय प्रलंबित आहे यावर बोलू का, असा प्रतिप्रश्न केला.