शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

रिमझिम पावसाने पिकांना जीवदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:51 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्याप्रकारात पावसाने बरसण्यास सुरु वात केली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येउ शकेल. कारण आवणीसाठी असाच भिज पाउस हवा असतो.

ठळक मुद्देअशा पावसात भात नागली वरई या पिकांची आवणी सहज होउन जाईल.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्याप्रकारात पावसाने बरसण्यास सुरु वात केली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येउ शकेल. कारण आवणीसाठी असाच भिज पाउस हवा असतो.त्र्यंबकेश्वर तालुक्यात खरीपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरणी पुर्ण झालेली आहे. उर्वरीत पेरणी सध्याच्या रिमझिम पावसात आटोपली जाईल तरी पुढील ीन-चार दिवसात जोरदार पावसाची गरज आहे. असाच पाउस पडुन उन पडल्यास उभ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी कमी पाउस असला तरी सध्या तरी पिकांसाठी उपयुक्त असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.भात, नागली, वरई लावणीसाठी अशाच प्रकारच्या पावसाची गरज असते. सारखी पावसाची झड असली तर या पिकांची आवणी (लावणी) करता येत नाही. अशा पावसात भात नागली वरई या पिकांची आवणी सहज होउन जाईल.- कैलास मिंदे, शेतकरी, त्र्यंबकेश्वर.दरम्यान तालुका कृषि विभागाने दिलेल्या पेरणी अहवाला नुसार भात सर्वसाधारण क्षेत्र ११६३४ हेक्टर पैकी ९६५४ हेक्टर पेरणी पुर्ण झाली आहे. नागली ५३९४ हेक्टर पैकी २०६८.३१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. वरई ३२४१ हेक्टर पैकी ८२५.०६ हेक्टर पेरणी झाली आहे. तर तूरडाळ, मुग, मसुर, उडीद या कडधान्याचे क्षेत्र कमी असल्याने पेरणी पुर्ण झाली आहे. तसेच खुरासणी, भुईमुग, सुर्यफुल, सोयाबीनचे क्षेत्रही कमी असल्याने त्याचीपेरणी पुर्ण झाली आहे. आता फक्त भात नागली व वरई या पिकांचे पेरणीचे उर्वरीत क्षेत्र थोडे असल्याने लवकरच तेही पुर्ण होईल.या आठवड्यात शंभरटक्के पेरणीचे उद्दीष्ट पुर्ण होईल. श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. पण निम्मा श्रावण होउन गेला तरी दमदार पावसाचा अजुन पत्ता नाही. दोन दिवसांपासून आता कुठे रिमझिम स्वरु पात पाउस सुरु झाला आहे.या वर्षी आजपर्यंत पडलेला पाऊस...त्र्यंबकेश्वर ४७३ मि मी. वेळुंजे ६३४ मि मी. व हरसुल ७३४ मि मी. पाऊस आतापर्यंत झाला आहे. तर मागच्या वर्षी आतापर्यंत १४०० मि मी. पाउस झाला होता. (फोटो ०४ टीबीके)

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस