शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे भात उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:40 IST

नांदूरवैद्य : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन हंगामात पावसाने तोंडाशी ...

नांदूरवैद्य : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन हंगामात पावसाने तोंडाशी आलेले पीक जमिनदोस्त केल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया गेला असून आणि त्यातच करपा, तुडतुड्या या रोगाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इगतपुरी तालुक्यात जवळपास तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. यावर्षी सुरुवातीला पावसाने सुरुवात चांगली केली असली तरी शेतकऱ्यांनी पीक विमे भरले असताना शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत. भातालाही कवडीमोल भाव असल्यामुळे दिवाळीतदेखील शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. भात पिकाचे करपा व तुडतुड्या या रोगाने नुकसान केले आहे. इगतपुरी तालुका कृषी विभागाच्यावतीने रोग गेलेल्या भात पिकावर पंचनामे करण्याचे सौजन्यदेखील दाखवले नाही. अशा अक्षम्य कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी यांची तालुक्यातून बदली करण्याची मागणी शेतकरी नेते बाळासाहेब धुमाळ यांनी केली आहे.

----------------------

गत काही वर्षात वाढलेली महागाई शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात भक्कम वाढ करणारी ठरलेली असताना भातास मिळणारा बाजारभाव शेतकऱ्यास कर्जबाजारी करत आहे. खडीबरड एकर दीड एकर जमीन असलेला अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी भातशेती करण्यापेक्षा ती शेतजमीन विकून पोट भरण्याच्या मार्गाला लागलेला दिसून येत आहे. आजच्या दिवसात भातशेतीस लागवडीसह एकरी खर्च २० हजाराच्या पुढे गेला आहे तर मिळणारे उत्पन्न दहा ते पंधरा हजाराची मर्यादा ओलांडत नाही. सरासरी एकरी उत्पन्न १० क्विंटल आहे. किमान भाव २००० रुपये मिळाल्यास एकूण उत्पन्न २०००० रुपये व खर्च २५००० असा तोट्याचा धंदा झाला आहे.

--------------------

भात पिकास येणारा खर्च याप्रमाणे आहे

बियाणे - २००० रुपये

मशागत - ३००० रुपये

खते - ५०० ते २००० रुपये

लावणीची मजुरी - १०००० रुपये

निंदण मजुरी - ३००० रुपये

सोंगणी व इतर - ५००० रुपये

. -----------------------------

एकूण २५००० रुपये आणि एकरी उत्पन्न २० हजार.

---------------------

यावर्षी सर्वदूर अवकाळी पावसाने व रोगाने भात शेती अगदी भुईसपाट केली आहे. पावसाचा हंगाम होऊन गेल्यानंतरही ही पिके शेतात पडून होती. एकीकडे पाऊस सुरू आणि खाली बळीराजा भात झोडण्याचे चित्र तालुक्यात दिसत होते. इगतपुरी कृषी विभागाकडून पंचनामे कधी झाले, तेच समजलं नाही. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या व रोगाच्या कचाट्यातून वाचलेली भात पिके वाचवली असताना इगतपुरी कृषी विभागाने पंचनामे केले नाही.

- बाळासाहेब धुमाळ, शेतकरी संघटना.

(१६ नांदूरवैद्य१)

===Photopath===

161220\16nsk_2_16122020_13.jpg

===Caption===

(१६ नांदूरवैद्य१)