शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

अवकाळी पावसामुळे भात उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:40 IST

नांदूरवैद्य : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन हंगामात पावसाने तोंडाशी ...

नांदूरवैद्य : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन हंगामात पावसाने तोंडाशी आलेले पीक जमिनदोस्त केल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया गेला असून आणि त्यातच करपा, तुडतुड्या या रोगाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इगतपुरी तालुक्यात जवळपास तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. यावर्षी सुरुवातीला पावसाने सुरुवात चांगली केली असली तरी शेतकऱ्यांनी पीक विमे भरले असताना शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत. भातालाही कवडीमोल भाव असल्यामुळे दिवाळीतदेखील शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. भात पिकाचे करपा व तुडतुड्या या रोगाने नुकसान केले आहे. इगतपुरी तालुका कृषी विभागाच्यावतीने रोग गेलेल्या भात पिकावर पंचनामे करण्याचे सौजन्यदेखील दाखवले नाही. अशा अक्षम्य कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी यांची तालुक्यातून बदली करण्याची मागणी शेतकरी नेते बाळासाहेब धुमाळ यांनी केली आहे.

----------------------

गत काही वर्षात वाढलेली महागाई शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात भक्कम वाढ करणारी ठरलेली असताना भातास मिळणारा बाजारभाव शेतकऱ्यास कर्जबाजारी करत आहे. खडीबरड एकर दीड एकर जमीन असलेला अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी भातशेती करण्यापेक्षा ती शेतजमीन विकून पोट भरण्याच्या मार्गाला लागलेला दिसून येत आहे. आजच्या दिवसात भातशेतीस लागवडीसह एकरी खर्च २० हजाराच्या पुढे गेला आहे तर मिळणारे उत्पन्न दहा ते पंधरा हजाराची मर्यादा ओलांडत नाही. सरासरी एकरी उत्पन्न १० क्विंटल आहे. किमान भाव २००० रुपये मिळाल्यास एकूण उत्पन्न २०००० रुपये व खर्च २५००० असा तोट्याचा धंदा झाला आहे.

--------------------

भात पिकास येणारा खर्च याप्रमाणे आहे

बियाणे - २००० रुपये

मशागत - ३००० रुपये

खते - ५०० ते २००० रुपये

लावणीची मजुरी - १०००० रुपये

निंदण मजुरी - ३००० रुपये

सोंगणी व इतर - ५००० रुपये

. -----------------------------

एकूण २५००० रुपये आणि एकरी उत्पन्न २० हजार.

---------------------

यावर्षी सर्वदूर अवकाळी पावसाने व रोगाने भात शेती अगदी भुईसपाट केली आहे. पावसाचा हंगाम होऊन गेल्यानंतरही ही पिके शेतात पडून होती. एकीकडे पाऊस सुरू आणि खाली बळीराजा भात झोडण्याचे चित्र तालुक्यात दिसत होते. इगतपुरी कृषी विभागाकडून पंचनामे कधी झाले, तेच समजलं नाही. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या व रोगाच्या कचाट्यातून वाचलेली भात पिके वाचवली असताना इगतपुरी कृषी विभागाने पंचनामे केले नाही.

- बाळासाहेब धुमाळ, शेतकरी संघटना.

(१६ नांदूरवैद्य१)

===Photopath===

161220\16nsk_2_16122020_13.jpg

===Caption===

(१६ नांदूरवैद्य१)