शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
3
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
4
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
5
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
6
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
7
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
8
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
9
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
10
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
11
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
12
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
13
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
14
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
15
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
16
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
17
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
18
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
19
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
20
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीच्या प्रदूषणाची याचिका पुनरुज्जीवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:49 IST

दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या याचिकेचे न्यायालयाने पुनरुज्जीवन करून घेतले असून यासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.१) सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या राज्य शासनाने नद्यांच्या नियमन करणाऱ्या झोनचा आदेश मोडीत काढल्याने त्याबाबत न्यायालयाने विचारणा केली असून, त्यामुळे राज्यातील सर्व नद्यांच्या विषयाला महत्त्व देणारा मुद्दा हाताळला जाणार आहे.

नाशिक : दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या याचिकेचे न्यायालयाने पुनरुज्जीवन करून घेतले असून यासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.१) सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या राज्य शासनाने नद्यांच्या नियमन करणाऱ्या झोनचा आदेश मोडीत काढल्याने त्याबाबत न्यायालयाने विचारणा केली असून, त्यामुळे राज्यातील सर्व नद्यांच्या विषयाला महत्त्व देणारा मुद्दा हाताळला जाणार आहे.२०१२ मध्ये गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत राजेश पंडित यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने वेळोवेळी अनेक आदेश निर्गमित केले असून, त्यामुळे काही प्रमाणात सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या होत्या; मात्र सुरुवातीला न्यायालयात याचिका असेपर्यंत सक्रिय असणाºया शासकीय यंत्रणा ढेपाळल्या आहेत. गोदावरी नदीची अस्वच्छता चव्हाट्यावर आली आहे. पोलीस यंत्रणेला गोदा प्रदू्षित करणाºयांवर गुन्हे दाखल करावेत, प्लेटिंगसह अन्य प्रदूषणकारी उद्योगांनी रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी उभारलेला नाही. महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण आणि अन्य अनेक कामे बाकी असून, त्या पार्श्वभूमीवर आता केवळ निकाल देण्याच्या स्तरावर असलेल्या या याचिकेचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. राज्य सरकारने नदीपात्रालगत कोणते उद्योग किती अंतरावर असावे यांसह महत्त्वाच्या नदी नियमन क्षेत्राचा नियमच रद्द केल्याने उच्च न्यायालयाने त्यासंदर्भात जाब विचारला आहे. नाशिक मनपाच्या प्रलंबित पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्राबाबतदेखील न्यायालयाने माहिती विचारली आहे. दि. १ नोव्हेंबर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी दाखल याचिकेमुळे आजवर शासकीय यंत्रणा सक्रिय झाल्याने अनेक प्रकारचे फायदे झाले आहेत. पूररेषतील बांधकामे हटविण्यात आली आहेत. तसेच गोदावरी नदीवरील पुलांवर जाळ्या टाकून निर्माल्य आणि कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे.

टॅग्स :godavariगोदावरीpollutionप्रदूषण