शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

नद्यांना पुनर्जीवित करा: राजेंद्र सिंह

By admin | Updated: July 1, 2015 01:41 IST

नद्यांना पुनर्जीवित करा: राजेंद्र सिंह

नाशिक : साडेचारशे वर्षांपूर्वी सिंंहस्थ कुंभमेळ्याला मोठी प्रतिष्ठा होती; मात्र ती लुप्त झाल्याने सध्या कुंभमेळा हा केवळ साधूंच्या लढाईचे ठिकाण बनला आहे. पूर्वीच्या कुंभमेळ्यात नीर, नदी व नारी अशा भारतीय संस्कृतीतील तीन महत्त्वांच्या घटकांचा आदर केला जात असे. सिंहस्थाला तीच पूर्वप्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी नद्यांना पुनर्जीवित करा, असे आवाहन प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी नाशिककरांना केले. नंदिनी पुनर्भरण समितीच्या वतीने खिमजी भगवानदास आरोग्यभवनात आयोजित ‘नीर, नदी, नारी’ सन्मान कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते रामकुंडावर गोदामातेची आरती करून नाशिक परिसरातील अरुणा, नीलगंगा, नंदिनी, वाघाडी, वालदेवी, कपिला व अहिल्या या सात नद्यांचे कमंडलूत आणलेले पाणी गोदावरीला अर्पण करण्यात आले. तत्पूर्वी, कार्यक्रमात राज्याच्या जलसंवर्धन विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त ललिता शिंदे, भाजपा नेते गोपाळ पाटील, अंजली पाटील, अ‍ॅड. मुग्धा सपटणेकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. सिंह म्हणाले, भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड वैविध्यपूर्ण देश असल्याने वैचारिक मंथनासाठी पूर्वी कुंभमेळ्याच्या निमित्ताने लोक दर बारा वर्षांनी एकत्र येत, समाजातील वाईट चाली काढून टाकून चांगले नियम तयार करीत. कुंभमेळ्यातूनच पुढील १२ वर्षांची दिशा ठरवली जात असे. स्नानावरून लढाईचा नव्हे, तर शांतीचा संदेश दिला जाई. अगदी अकबर, हुमायूनसारखे मुस्लीम बादशहाही कुंभमेळ्यास उपस्थित राहत. नंतरच्या काळात इंग्रजांनी कुंभमेळा हा फक्त हिंदूंचा धार्मिक उत्सव असल्याचे सांगत त्यात ठरवलेले नियम समाजाला बंधनकारक नसल्याचे सांगितले. तेव्हापासून कुंभमेळ्याची दुर्दशा होत गेली. कुंभमेळ्याला पूर्वप्रतिष्ठा देण्याची यंदा चांगली संधी असून, त्यासाठी नीर, नदी व नारीचा सन्मान करायला हवा. देशातील प्रत्येक नदीचे रक्षण करणे हे संविधानानुसार प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नद्यांना पुनर्जीवित करणे हाच कुंभाचा खरा अर्थ असल्याचेही ते म्हणाले. यावेळी ललिता शिंदे, दत्ताजी ढगे, देवांग जानी यांनी मनोगत व्यक्त केले. विशाखा देसले, सोनी जयस्वाल यांनी नृत्याविष्कार सादर केला. गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेश भुसाने यांनी सूत्रसंचालन केले. राजेश पंडित यांनी आभार मानले.