शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दर सहा महिन्यांनी घेणार विभागीय कामकाजाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:42 IST

नाशिक : राज्यातील जनतेच्या सरकारकडून अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे प्रश्न आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विभागीय ...

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे : राज्यातील रखडलेले प्रकल्पही मार्गी लावणार

नाशिक : राज्यातील जनतेच्या सरकारकडून अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे प्रश्न आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विभागात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याबरोबर अशा आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामकाजाचा आढावा दर तीन ते सहा महिन्यांनी घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्टÑातील पाचही जिल्ह्णांची आढावा बैठक पार पडली. विभागीय बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विभागीय बैठकीचा उद्देश सांगतांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आढावा घेणे अपेक्षित असल्याचे सांगितले.उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच बैठक होती. या बैठकीमध्ये नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्णातील आमदार तसेच तेरा विविध शासकीय विभागांचे सचिव, अपर सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवरही साधक-बाधक चर्चा करण्यात आली.लोकप्रतिनिधींचे प्रश्न थेट सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. काही महत्त्वाचे निर्णय या बैठकांमध्ये झाल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठका घेणे आवश्यक असून, दर तीन ते सहा महिन्यांनी आढावा घेईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते.आढावा बैठकीमध्ये उत्तर महाराष्टÑातील रखडलेले प्रकल्प, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा यासह अनेक प्रश्न जाणून घेण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामकाजाची माहिती घेण्यात आली तर काही प्रश्न लागलीच प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा झाली. काही रखडलेल्या प्रकल्पांवर मार्ग काढण्यात आला. काही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री