शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीसाठी महसूल खात्याची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:51 IST

नाशिक : राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू असून, त्यातच चार दिवस लागोपाठ सुट्या आल्यामुळे वसुलीची चिंता भेडसावू लागली आहे.

ठळक मुद्देसलग चार दिवस सुट्यांमुळे चिंता शासनस्तरावर यासंदर्भात निर्णय होण्याची आशा महसूल खाते बाळगून

नाशिक : राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू असून, त्यातच चार दिवस लागोपाठ सुट्या आल्यामुळे वसुलीची चिंता भेडसावू लागली आहे.राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला यंदा २०५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उद्दिष्टअधिक असले तरी, करमणूक करापोटी दरवर्षी मिळणारे कोट्यवधी रुपये तसेच शिक्षण उपकर व रोहयो करापोटी मिळणारे कर आता बंद करण्यात आल्याने प्रशासनाला जवळपास ५० ते ६० कोटींचा फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत वसुलीचे उद्दिष्ट पार करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महसूल अधिकारी, कर्मचाºयांची धावपळ उडाली आहे. अशातच न्यायालयाने वाळू ठिय्यांच्या लिलावाला स्थगिती दिल्याने त्यापोटी मिळणारे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे नजराणा, गौणखनिज, शेतसारा, बिनशेती अशा करांच्या माध्यमातून वसुली केली जात असून, बुधवार अखेर १६४ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ७८ टक्के वसुली झाली असून, येत्या दोन दिवसांत ४० कोटी म्हणजे २२ टक्के वसुली करण्याचे आव्हान आहे. परंतु शासनाकडून दिलेले उद्दिष्ट अंतिम क्षणी कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच राज्य सरकारला पत्र पाठवून गौण खनिज, करमणूक कर आदी करांपासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याचे कळविले आहे. त्यामुळे शासनस्तरावर यासंदर्भात निर्णय होण्याची आशा महसूल खाते बाळगून आहे.