शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वसुलीसाठी महसूल खात्याची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:51 IST

नाशिक : राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू असून, त्यातच चार दिवस लागोपाठ सुट्या आल्यामुळे वसुलीची चिंता भेडसावू लागली आहे.

ठळक मुद्देसलग चार दिवस सुट्यांमुळे चिंता शासनस्तरावर यासंदर्भात निर्णय होण्याची आशा महसूल खाते बाळगून

नाशिक : राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू असून, त्यातच चार दिवस लागोपाठ सुट्या आल्यामुळे वसुलीची चिंता भेडसावू लागली आहे.राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला यंदा २०५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उद्दिष्टअधिक असले तरी, करमणूक करापोटी दरवर्षी मिळणारे कोट्यवधी रुपये तसेच शिक्षण उपकर व रोहयो करापोटी मिळणारे कर आता बंद करण्यात आल्याने प्रशासनाला जवळपास ५० ते ६० कोटींचा फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत वसुलीचे उद्दिष्ट पार करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महसूल अधिकारी, कर्मचाºयांची धावपळ उडाली आहे. अशातच न्यायालयाने वाळू ठिय्यांच्या लिलावाला स्थगिती दिल्याने त्यापोटी मिळणारे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे नजराणा, गौणखनिज, शेतसारा, बिनशेती अशा करांच्या माध्यमातून वसुली केली जात असून, बुधवार अखेर १६४ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ७८ टक्के वसुली झाली असून, येत्या दोन दिवसांत ४० कोटी म्हणजे २२ टक्के वसुली करण्याचे आव्हान आहे. परंतु शासनाकडून दिलेले उद्दिष्ट अंतिम क्षणी कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच राज्य सरकारला पत्र पाठवून गौण खनिज, करमणूक कर आदी करांपासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याचे कळविले आहे. त्यामुळे शासनस्तरावर यासंदर्भात निर्णय होण्याची आशा महसूल खाते बाळगून आहे.