शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

महसूल मंत्रालयात बदल्यांचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:15 IST

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला असून, एकेका अधिकाऱ्याच्या दोन ते तीन वेळा बदल्या करण्यात आल्याने महसूल अधिकारी सैरभैर झाले आहेत.

नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला असून, एकेका अधिकाऱ्याच्या दोन ते तीन वेळा बदल्या करण्यात आल्याने महसूल अधिकारी सैरभैर झाले आहेत. आयोगाच्या नियम व निकषातच जर बदल्या केल्या गेल्या असतील तर अशा बदल्या कोणत्या निकषाच्या आधारे पुन्हा पुन्हा बदलू लागल्या आहेत, असा सवालही केला जात आहे.स्वजिल्हा, एकाच जिल्ह्णात तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले, निवडणुकीची कामे केलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २० फेब्रुवारीपर्यंत करून त्याचा अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्याचे आदेश असल्याने महसूल मंत्रालयाने गेल्या बुधवारी राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या केल्या. या बदल्यांसाठी लावण्यात आलेले निकष पाहता, अपवाद वगळता एखाद-दुसरा अधिकारी बदलीच्या कचाट्यातून सुटला असेल.अनेक अधिकाºयांचा मंत्रालयात तळसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून मंत्रालयात काही अधिकाºयांनी तळ ठोकला असून, सोयीची बदली करण्यासाठी ‘काहीही’ करण्याची तयारी अधिकारी दर्शवित असल्याने त्याला मंत्रालयातील संबंधित अधिकाºयांकडून तसा प्रतिसादही मिळत असल्यानेच दरदिवशी बदल्यांच्या आदेशात बदल होत असल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जात आहे.महसूल खात्याने २५ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागातील दहा तहसीलदारांच्या पुनर्बदल्या केल्या तर त्याचदिवशी आणखी दोन उपजिल्हाधिकाºयांच्या बदल्यांमध्ये फेरबदल केला आहे. नाशिक विभागाप्रमाणे अन्य विभागातही बदल्यांचा मचका सुरूच असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.महसूल विभागाने या बदल्या करताना अत्यंत काटेकोरपणे व त्या त्या विभागीय आयुुक्तांकडून दोन ते चार वेळा खात्री करून त्यावर शिक्कामोर्तब केले. परिणामी या बदल्यांमुळे गैरसोय झाली अथवा नियम, निकष डावलून बदली झाल्यामुळे कोणी अधिकारी ‘मॅट’मध्ये गेल्याचेही ऐकिवात नाही. इतक्या ‘पारदर्शी’ परंतु ‘अनेकविध चर्चेत’ अधिकाºयांच्या बदल्या झालेल्या असताना त्यात मात्र महसूल मंत्रालयाकडून दररोज नवनवीन बदल होऊ लागले आहेत. बदली होऊन नियुक्तीच्या ठिकाणी अधिकारी हजर होत नाही तोच त्याची अन्यत्र बदली करण्यात येत असल्याचे पत्र हाती पडत आहे. अशा बदल्या करताना महसूल मंत्रालयाकडून ज्या काही क्लृप्त्या लढविल्या जात आहे, ते पाहता अधिकाºयांकडून संशय घेतला जात आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयTransferबदली