शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महसूल मंत्रालयात बदल्यांचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:15 IST

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला असून, एकेका अधिकाऱ्याच्या दोन ते तीन वेळा बदल्या करण्यात आल्याने महसूल अधिकारी सैरभैर झाले आहेत.

नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला असून, एकेका अधिकाऱ्याच्या दोन ते तीन वेळा बदल्या करण्यात आल्याने महसूल अधिकारी सैरभैर झाले आहेत. आयोगाच्या नियम व निकषातच जर बदल्या केल्या गेल्या असतील तर अशा बदल्या कोणत्या निकषाच्या आधारे पुन्हा पुन्हा बदलू लागल्या आहेत, असा सवालही केला जात आहे.स्वजिल्हा, एकाच जिल्ह्णात तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले, निवडणुकीची कामे केलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २० फेब्रुवारीपर्यंत करून त्याचा अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्याचे आदेश असल्याने महसूल मंत्रालयाने गेल्या बुधवारी राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या केल्या. या बदल्यांसाठी लावण्यात आलेले निकष पाहता, अपवाद वगळता एखाद-दुसरा अधिकारी बदलीच्या कचाट्यातून सुटला असेल.अनेक अधिकाºयांचा मंत्रालयात तळसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून मंत्रालयात काही अधिकाºयांनी तळ ठोकला असून, सोयीची बदली करण्यासाठी ‘काहीही’ करण्याची तयारी अधिकारी दर्शवित असल्याने त्याला मंत्रालयातील संबंधित अधिकाºयांकडून तसा प्रतिसादही मिळत असल्यानेच दरदिवशी बदल्यांच्या आदेशात बदल होत असल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जात आहे.महसूल खात्याने २५ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागातील दहा तहसीलदारांच्या पुनर्बदल्या केल्या तर त्याचदिवशी आणखी दोन उपजिल्हाधिकाºयांच्या बदल्यांमध्ये फेरबदल केला आहे. नाशिक विभागाप्रमाणे अन्य विभागातही बदल्यांचा मचका सुरूच असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.महसूल विभागाने या बदल्या करताना अत्यंत काटेकोरपणे व त्या त्या विभागीय आयुुक्तांकडून दोन ते चार वेळा खात्री करून त्यावर शिक्कामोर्तब केले. परिणामी या बदल्यांमुळे गैरसोय झाली अथवा नियम, निकष डावलून बदली झाल्यामुळे कोणी अधिकारी ‘मॅट’मध्ये गेल्याचेही ऐकिवात नाही. इतक्या ‘पारदर्शी’ परंतु ‘अनेकविध चर्चेत’ अधिकाºयांच्या बदल्या झालेल्या असताना त्यात मात्र महसूल मंत्रालयाकडून दररोज नवनवीन बदल होऊ लागले आहेत. बदली होऊन नियुक्तीच्या ठिकाणी अधिकारी हजर होत नाही तोच त्याची अन्यत्र बदली करण्यात येत असल्याचे पत्र हाती पडत आहे. अशा बदल्या करताना महसूल मंत्रालयाकडून ज्या काही क्लृप्त्या लढविल्या जात आहे, ते पाहता अधिकाºयांकडून संशय घेतला जात आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयTransferबदली