शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

महसूल मंत्रालयात बदल्यांचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:15 IST

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला असून, एकेका अधिकाऱ्याच्या दोन ते तीन वेळा बदल्या करण्यात आल्याने महसूल अधिकारी सैरभैर झाले आहेत.

नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला असून, एकेका अधिकाऱ्याच्या दोन ते तीन वेळा बदल्या करण्यात आल्याने महसूल अधिकारी सैरभैर झाले आहेत. आयोगाच्या नियम व निकषातच जर बदल्या केल्या गेल्या असतील तर अशा बदल्या कोणत्या निकषाच्या आधारे पुन्हा पुन्हा बदलू लागल्या आहेत, असा सवालही केला जात आहे.स्वजिल्हा, एकाच जिल्ह्णात तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले, निवडणुकीची कामे केलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २० फेब्रुवारीपर्यंत करून त्याचा अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्याचे आदेश असल्याने महसूल मंत्रालयाने गेल्या बुधवारी राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या केल्या. या बदल्यांसाठी लावण्यात आलेले निकष पाहता, अपवाद वगळता एखाद-दुसरा अधिकारी बदलीच्या कचाट्यातून सुटला असेल.अनेक अधिकाºयांचा मंत्रालयात तळसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून मंत्रालयात काही अधिकाºयांनी तळ ठोकला असून, सोयीची बदली करण्यासाठी ‘काहीही’ करण्याची तयारी अधिकारी दर्शवित असल्याने त्याला मंत्रालयातील संबंधित अधिकाºयांकडून तसा प्रतिसादही मिळत असल्यानेच दरदिवशी बदल्यांच्या आदेशात बदल होत असल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जात आहे.महसूल खात्याने २५ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागातील दहा तहसीलदारांच्या पुनर्बदल्या केल्या तर त्याचदिवशी आणखी दोन उपजिल्हाधिकाºयांच्या बदल्यांमध्ये फेरबदल केला आहे. नाशिक विभागाप्रमाणे अन्य विभागातही बदल्यांचा मचका सुरूच असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.महसूल विभागाने या बदल्या करताना अत्यंत काटेकोरपणे व त्या त्या विभागीय आयुुक्तांकडून दोन ते चार वेळा खात्री करून त्यावर शिक्कामोर्तब केले. परिणामी या बदल्यांमुळे गैरसोय झाली अथवा नियम, निकष डावलून बदली झाल्यामुळे कोणी अधिकारी ‘मॅट’मध्ये गेल्याचेही ऐकिवात नाही. इतक्या ‘पारदर्शी’ परंतु ‘अनेकविध चर्चेत’ अधिकाºयांच्या बदल्या झालेल्या असताना त्यात मात्र महसूल मंत्रालयाकडून दररोज नवनवीन बदल होऊ लागले आहेत. बदली होऊन नियुक्तीच्या ठिकाणी अधिकारी हजर होत नाही तोच त्याची अन्यत्र बदली करण्यात येत असल्याचे पत्र हाती पडत आहे. अशा बदल्या करताना महसूल मंत्रालयाकडून ज्या काही क्लृप्त्या लढविल्या जात आहे, ते पाहता अधिकाºयांकडून संशय घेतला जात आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयTransferबदली