शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पीककर्जाचे धनादेश न वटताच परत

By admin | Updated: September 7, 2016 01:17 IST

शेतकरी हवालदिल : जिल्हा बॅँकेचे कानावर हात

नाशिक : चार महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या पीककर्जाचे धनादेश कसेबसे हाती पडलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम घेण्यासाठी बँकेत धनादेश वटण्यासाठी टाकले असता, जिल्हा बॅँकेत पैसे शिल्लक नसल्याचे कारण देऊन त्यांना पिटाळून लावण्यात आले. शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांकडे धाव घेऊन आपली व्यथा मांडली, तथापि, आश्वासनापलीकडे त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील जवळपास पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिल महिन्यातच चांदोरी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत जिल्हा बॅँकेकडून पीक कर्ज मंजूर करून घेतले असून, साधारणत: एक ते दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बॅँकेने मंजूरही करून ठेवले व त्यातील २५ टक्के रक्कम आगावू शेतकऱ्यांच्या हातातही टेकविली, त्यामोबदल्यात शेतकऱ्यांच्या जमिनीही तारण ठेवून घेतल्या. दरम्यान, सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बागांची छाटणी व त्यानंतर खत टाकण्याची तयारी सुरू करून त्यासाठी जिल्हा बॅँकेने मंजूर केलेल्या कर्जाची मागणी करण्यास सुरुवात केली असता, प्रारंभी सोसायटीने धनादेश देण्यास नकार दिला. जवळपास महिनाभर शेतकऱ्यांनी सोसायटीचे उंबरठे झिजविल्यानंतर दोन दिवसांपूर्वी गावातील सुमारे पाचशे शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले, त्यामुळे खुषित असलेल्या शेतकऱ्यांनी धनादेश वटण्यासाठी जिल्हा बॅँकेच्या शाखेत टाकले असता, बॅँकेकडे पैसेच शिल्लक नसल्याचे कारण देत त्यांचे धनादेश परत करण्यात आले. विशेष म्हणजे चांदोरी सोसायटीने गेल्या मार्चमध्येच जिल्हा बॅँकेच्या संपूर्ण कर्जाची परतफेड केली असून, गेल्या पंचवीस वर्षांपासून शेतकरी दरवर्षी बॅँकेकडून कर्ज घेत असताना यंदा मात्र बॅँकेने नकार दिल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यांनी थेट जिल्हा बॅँकेत धाव घेऊन बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची भेट घेऊन व्यथा मांडली, परंतु दराडे यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. बॅँकेला शासनाकडून पैसे मिळाले नाहीत, आम्ही कुठून द्यायचे असा उलट सवालच त्यांनी शेतकऱ्यांना केला. त्यावर कर्ज मिळाले नाही, तर शेतकरी देशोधडीला लागून आत्महत्त्या करतील, असे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर दराडे यांनी त्यात रस दाखविला नाही, अशी माहिती सुरेश भोज यांनी दिली. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कुऱ्हे यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी तक्रार अर्ज द्या, चौकशी करतो असे सांगून बोळवण केल्यावर अखेर संताप अनावर झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, परंतु जिल्हाधिकारीही बैठकीत व्यस्त होते.