शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

रोख रकमेसह पुरस्कार घेणार परत

By admin | Updated: December 8, 2015 23:28 IST

निर्मलग्राम पुरस्कार : मुदतीत झाले नाही हगणदारीमुक्त गाव

नाशिक : गेल्या दशकभरापासून निर्मलग्राम पुरस्कार लाभलेल्या व त्या अनुषंगाने लाखो रुपयांचे पुरस्कार स्वीकारूनही, केंद्र शासनाने दिलेल्या अंतिम मुदतीत शंभर टक्के हगणदारीमुक्त गाव न केलेल्या ग्रामपंचायतींचे पुरस्कार परत घेतले जाणार असल्याचे वृत्त आहे.या निर्णयामुळे जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींकडून निर्मलग्राम पुरस्काराची रक्कम परत घेण्याबरोबरच संबंधित गावचा निर्मलग्राम पुरस्कार काढून घेण्यात येणार असल्याने या १०७ ग्रामपंचायतींच्या विद्यमान सरपंच व ग्रामसेवकांवर पुरस्कार व पुरस्काराची रक्कम परत देण्याची नामुष्की ओढवणार आहे. जिल्ह्यात २००२-०३ पासून आजपर्यंत २२७ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम हगणदारीमुक्त पुरस्कार लाभला आहे. या पुरस्कारापोटी अनुक्रमे ५, ३ व २ लाखांची रक्कमही संबंधित ग्रामपंचायतींना गावच्या विकासासाठी देण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियानाच्या एका पथकाने केलेल्या पाहणीत कागदावर जरी शंभर टक्के हगणदारीमुक्त गावे दिसत असली तरी प्रत्यक्षात ती गावे श्ांभर टक्के हगणदारीमुक्त नसल्याचे आढळले होते. त्यानुसार केंद्र सरकारने जून २०१५ मध्येच राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या ग्रामस्वच्छता अभियान कार्यालयांना लेखी सूचना देऊन निर्मलग्राम पुरस्कार मिळालेली गावे २ आॅक्टोबर २०१५ पर्यंत शंभर टक्के हगणदारीमुक्त (ओपन डिफेसेटिव्ही फ्री व्हिलेज-ओडीएफ) करावीत अन्यथा संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आलेला निर्मलग्राम पुरस्कार आणि पुरस्कारापोटी दिलेली रक्कम परत घेण्यात येईल, असे कळविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना कळवून गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिलेल्या कालावधीत २२७ पैकी केवळ १२० गावे शंभर टक्के हगणदारीमुक्त झाली. उर्वरित १०७ ग्रामपंचायतींचे निर्मलग्राम पुरस्कार व पुरस्काराची रक्कम आता परत घेण्याची कार्यवाही विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)