शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

रोख रकमेसह पुरस्कार घेणार परत

By admin | Updated: December 8, 2015 23:28 IST

निर्मलग्राम पुरस्कार : मुदतीत झाले नाही हगणदारीमुक्त गाव

नाशिक : गेल्या दशकभरापासून निर्मलग्राम पुरस्कार लाभलेल्या व त्या अनुषंगाने लाखो रुपयांचे पुरस्कार स्वीकारूनही, केंद्र शासनाने दिलेल्या अंतिम मुदतीत शंभर टक्के हगणदारीमुक्त गाव न केलेल्या ग्रामपंचायतींचे पुरस्कार परत घेतले जाणार असल्याचे वृत्त आहे.या निर्णयामुळे जिल्ह्यातील १०७ ग्रामपंचायतींकडून निर्मलग्राम पुरस्काराची रक्कम परत घेण्याबरोबरच संबंधित गावचा निर्मलग्राम पुरस्कार काढून घेण्यात येणार असल्याने या १०७ ग्रामपंचायतींच्या विद्यमान सरपंच व ग्रामसेवकांवर पुरस्कार व पुरस्काराची रक्कम परत देण्याची नामुष्की ओढवणार आहे. जिल्ह्यात २००२-०३ पासून आजपर्यंत २२७ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम हगणदारीमुक्त पुरस्कार लाभला आहे. या पुरस्कारापोटी अनुक्रमे ५, ३ व २ लाखांची रक्कमही संबंधित ग्रामपंचायतींना गावच्या विकासासाठी देण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियानाच्या एका पथकाने केलेल्या पाहणीत कागदावर जरी शंभर टक्के हगणदारीमुक्त गावे दिसत असली तरी प्रत्यक्षात ती गावे श्ांभर टक्के हगणदारीमुक्त नसल्याचे आढळले होते. त्यानुसार केंद्र सरकारने जून २०१५ मध्येच राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या ग्रामस्वच्छता अभियान कार्यालयांना लेखी सूचना देऊन निर्मलग्राम पुरस्कार मिळालेली गावे २ आॅक्टोबर २०१५ पर्यंत शंभर टक्के हगणदारीमुक्त (ओपन डिफेसेटिव्ही फ्री व्हिलेज-ओडीएफ) करावीत अन्यथा संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आलेला निर्मलग्राम पुरस्कार आणि पुरस्कारापोटी दिलेली रक्कम परत घेण्यात येईल, असे कळविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना कळवून गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिलेल्या कालावधीत २२७ पैकी केवळ १२० गावे शंभर टक्के हगणदारीमुक्त झाली. उर्वरित १०७ ग्रामपंचायतींचे निर्मलग्राम पुरस्कार व पुरस्काराची रक्कम आता परत घेण्याची कार्यवाही विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)