शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

परतीच्या पावसाने जिल्ह्यात  द्राक्ष उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:57 IST

हवामान खात्याने   येत्या काही दिवसांत राज्यभर जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवल्याने  जिल्ह्यातील द्राक्षबागायातदार धास्तावले आहेत. सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. जिल्ह्यातील खरीप पिकांसाठी जीवदान ठरलेला पाऊस परतताना नुकसान करण्याच्या भीतीने जिल्ह्यातील सर्वच शेतकरी चिंतित आहे. 

ठळक मुद्देबागांना दिवसरात्र फवारणी हंगाम उशिरा घेऊनही पावसाने अखेर गाठले; खर्चात वाढ

सायखेडा : हवामान खात्याने   येत्या काही दिवसांत राज्यभर जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवल्याने  जिल्ह्यातील द्राक्षबागायातदार धास्तावले आहेत. सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. जिल्ह्यातील खरीप पिकांसाठी जीवदान ठरलेला पाऊस परतताना नुकसान करण्याच्या भीतीने जिल्ह्यातील सर्वच शेतकरी चिंतित आहे. गेल्या दोन वर्षात बेमोसमी आणि अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी  यंदा गोडबार छाटणी काहीशी उशिराने सुरू केली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणारा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाला मात्र परतीच्या पावसाने गाठले, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. वर्षातून एकदा घेतले जाणारे द्राक्ष पिकाला मोठी गुंतवणूक करावी लागते. गेल्या चार दिवसांपासून निफाड तालुक्यात परतीचा पाऊस सुरू असल्याने शेतकरी संकटात सापटला आहे. हा पाऊस द्राक्षांना नुकसानीचा ठरत आहे. पावसामुळे घड जिरण्याची समस्या निर्माण होत आहे. काही बागा अद्याप छाटणी होऊन सुप्त अवस्थेत असल्यामुळे त्यांच्यातील घड परिपक्व नसल्याने बाहेर निघताना कमकुवत दिसत आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसला आहे. शेतकरी लाॉकडाऊनमुळे अडचणीचा सामना करत असातानाच पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे. फवारणीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वायाकाही बागा फुलोऱ्यात तर काही पोंग्यात आहे या बागांना फवारणी कशी करावी  असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह तालुक्यात हजेरी लावल्याने फवारणी केलेली औषधे वाहून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तसेच वेळही खर्च झाला आहे.गेल्या दोन वर्षांपासून संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्याला यंदाच्या हंगामातून अपेक्षा होती, मात्र पावसाने पाणी फेरले गेले आहे. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लाॅकडाऊनमुळे आधीच शेतकरी पिचला आहे. यात परतीच्गा पावसाने नुकसान केल्याने शेतकरी संकटात सापडला आहेे.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीRainपाऊस