शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

परतीच्या पावसाने जिल्ह्यात  द्राक्ष उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:57 IST

हवामान खात्याने   येत्या काही दिवसांत राज्यभर जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवल्याने  जिल्ह्यातील द्राक्षबागायातदार धास्तावले आहेत. सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. जिल्ह्यातील खरीप पिकांसाठी जीवदान ठरलेला पाऊस परतताना नुकसान करण्याच्या भीतीने जिल्ह्यातील सर्वच शेतकरी चिंतित आहे. 

ठळक मुद्देबागांना दिवसरात्र फवारणी हंगाम उशिरा घेऊनही पावसाने अखेर गाठले; खर्चात वाढ

सायखेडा : हवामान खात्याने   येत्या काही दिवसांत राज्यभर जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवल्याने  जिल्ह्यातील द्राक्षबागायातदार धास्तावले आहेत. सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. जिल्ह्यातील खरीप पिकांसाठी जीवदान ठरलेला पाऊस परतताना नुकसान करण्याच्या भीतीने जिल्ह्यातील सर्वच शेतकरी चिंतित आहे. गेल्या दोन वर्षात बेमोसमी आणि अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी  यंदा गोडबार छाटणी काहीशी उशिराने सुरू केली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणारा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाला मात्र परतीच्या पावसाने गाठले, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. वर्षातून एकदा घेतले जाणारे द्राक्ष पिकाला मोठी गुंतवणूक करावी लागते. गेल्या चार दिवसांपासून निफाड तालुक्यात परतीचा पाऊस सुरू असल्याने शेतकरी संकटात सापटला आहे. हा पाऊस द्राक्षांना नुकसानीचा ठरत आहे. पावसामुळे घड जिरण्याची समस्या निर्माण होत आहे. काही बागा अद्याप छाटणी होऊन सुप्त अवस्थेत असल्यामुळे त्यांच्यातील घड परिपक्व नसल्याने बाहेर निघताना कमकुवत दिसत आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसला आहे. शेतकरी लाॉकडाऊनमुळे अडचणीचा सामना करत असातानाच पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे. फवारणीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वायाकाही बागा फुलोऱ्यात तर काही पोंग्यात आहे या बागांना फवारणी कशी करावी  असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह तालुक्यात हजेरी लावल्याने फवारणी केलेली औषधे वाहून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तसेच वेळही खर्च झाला आहे.गेल्या दोन वर्षांपासून संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्याला यंदाच्या हंगामातून अपेक्षा होती, मात्र पावसाने पाणी फेरले गेले आहे. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लाॅकडाऊनमुळे आधीच शेतकरी पिचला आहे. यात परतीच्गा पावसाने नुकसान केल्याने शेतकरी संकटात सापडला आहेे.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीRainपाऊस