शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

परतीच्या पावसाचा द्राक्ष, टमाट्याला फटका ; सोयाबीन भूईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 18:52 IST

ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. तर टमाटा आणि सोयाबीनच्या मळ्यांवर करपा, शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शहर परिसरातील गंगापूर, दुगाव, मखमलाबाद, दरी, मातोरी, आडगाव, पिंपळगाव खांब, फाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.  

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा खरीप पिकांना फटका सततच्या हवामान बदलाने शेतकरी हवालदिल

नाशिक :  जिल्ह्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. तर टमाटा आणि सोयाबीनच्या मळ्यांवर करपा, शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शहर परिसरातील गंगापूर, दुगाव, मखमलाबाद, दरी, मातोरी, आडगाव, पिंपळगाव खांब, फाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.   नाशिक परिसरात कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याचा धोका वाढला आहे. फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान होणार असल्याने द्राक्षबागायतदारांनी द्राक्षबागांची विशेष काळजी घेत डिपिंग करण्यास सुरुवात केली असून, खराब झालेला शेंडा तोडून टाकण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागांचे गेल्या महिन्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले असताना त्यातून सावरलेला शेतकरी अचानक झालेल्या वातावरणामुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून, नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. सध्या फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला असून, फुलोऱ्यांतील बागांचे घड कमकुवत तयार होणे अथवा प्रारंभिक  अवस्थेतच जिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीचा कालावधी सुरू असतानाच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाल्यामुळे नव्याने छाटणी करण्यात आलेल्या बागांनाही रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने आता फुलोऱ्यातील बागांवर शेतकºयांना डिपींगच्या साह्याने रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.