नाशिक : जिल्ह्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. तर टमाटा आणि सोयाबीनच्या मळ्यांवर करपा, शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शहर परिसरातील गंगापूर, दुगाव, मखमलाबाद, दरी, मातोरी, आडगाव, पिंपळगाव खांब, फाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नाशिक परिसरात कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याचा धोका वाढला आहे. फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान होणार असल्याने द्राक्षबागायतदारांनी द्राक्षबागांची विशेष काळजी घेत डिपिंग करण्यास सुरुवात केली असून, खराब झालेला शेंडा तोडून टाकण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागांचे गेल्या महिन्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले असताना त्यातून सावरलेला शेतकरी अचानक झालेल्या वातावरणामुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून, नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. सध्या फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला असून, फुलोऱ्यांतील बागांचे घड कमकुवत तयार होणे अथवा प्रारंभिक अवस्थेतच जिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीचा कालावधी सुरू असतानाच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाल्यामुळे नव्याने छाटणी करण्यात आलेल्या बागांनाही रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने आता फुलोऱ्यातील बागांवर शेतकºयांना डिपींगच्या साह्याने रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.
परतीच्या पावसाचा द्राक्ष, टमाट्याला फटका ; सोयाबीन भूईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 18:52 IST
ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. तर टमाटा आणि सोयाबीनच्या मळ्यांवर करपा, शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शहर परिसरातील गंगापूर, दुगाव, मखमलाबाद, दरी, मातोरी, आडगाव, पिंपळगाव खांब, फाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
परतीच्या पावसाचा द्राक्ष, टमाट्याला फटका ; सोयाबीन भूईसपाट
ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा खरीप पिकांना फटका सततच्या हवामान बदलाने शेतकरी हवालदिल