शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

दिंडोरी तालुक्यातील ४०० परप्रांतीयांचा परतीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:14 IST

दिंडोरी : कामधंद्यासाठी उत्तर प्रदेशातून तालुक्यात दाखल झालेले सुमारे ४०० कामगार आपल्या गावी सुखरूप परतले आहेत.

ठळक मुद्दे२० बसेसद्वारे रेल्वेस्टेशनवर पोहचविले

लोकमत न्युज नेटवर्कदिंडोरी : कामधंद्यासाठी उत्तर प्रदेशातून तालुक्यात दाखल झालेले सुमारे ४०० कामगार आपल्या गावी सुखरूप परतले आहेत. दिंडोरी तालुका प्रशासनाने चोख नियोजन करून २० बसेसद्वारे त्यांना नाशिकरोड रेल्वेस्टेशनपर्यंत पोहोचविले. तेथून ते रेल्वेने आपल्या गावी गेले.दिंडोरी तालुका प्रशासनाने प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांनी नियोजन करत तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात असलेल्या स्थलांतरित कामगारांची नोंदणी केली होती.नायब तहसीलदार सूर्यवंशी, तलाठी रोहिणी अळकुटे, सागर बोरस्ते यांनी दिंडोरी येथे नियोजन करत विविध गावांत बसेस पाठविल्या. त्यानुसार गुरु वारी मध्य प्रदेशमधील सुमारे दीडशे कामगारांना रवाना करण्यात आले, तर शनिवारी दुपारी वीस बसेसमधून उत्तर प्रदेशमधील कामगारांना रवाना करण्यात आले. यावेळी कामगारांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेबद्दल राज्य सरकारचे व अधिकाऱ्यांचे आभार मानत कोरोनाचे संकट दूर झाले की पुन्हा येणार असल्याचे सांगत निरोप घेतला.तालुक्यातील दाखल असलेल्या बिहार व पश्चिम बंगालमधील कामगारांना घरवापसीची अद्याप प्रतीक्षा आहे. त्यांच्या राज्यात कधी गाडी जाणार, याबाबत सरकारी कार्यालयात त्यांच्याकडून वारंवार विचारणा होत आहे.अनेक कामगारांनी केला घरी जाण्याचा बेत रद्ददिंडोरी तालुक्यात सुमारे सात हजार परप्रांतीय कामगार आहेत. त्यात अनेकांनी गावोगाव तहसील कार्यालयात गावी जाण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र रेल्वेने जाणारे त्यात अत्यंत कमी आहेत. काही कामगार खासगी वाहनाने गावी गेले आहेत, मात्र आता कंपन्या सुरू झाल्याने तसेच लॉकडाउन शिथिल होत विविध कामे सुरू होण्याच्या अंदाज पाहता बहुतांशी कामगारांनी गावी परतण्याचा निर्णय रद्द केला आहे. नियमित रेल्वेसेवा सुरू होईल तेव्हाच परत जाण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सST Strikeएसटी संप