शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दिंडोरी तालुक्यातील ४०० परप्रांतीयांचा परतीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:14 IST

दिंडोरी : कामधंद्यासाठी उत्तर प्रदेशातून तालुक्यात दाखल झालेले सुमारे ४०० कामगार आपल्या गावी सुखरूप परतले आहेत.

ठळक मुद्दे२० बसेसद्वारे रेल्वेस्टेशनवर पोहचविले

लोकमत न्युज नेटवर्कदिंडोरी : कामधंद्यासाठी उत्तर प्रदेशातून तालुक्यात दाखल झालेले सुमारे ४०० कामगार आपल्या गावी सुखरूप परतले आहेत. दिंडोरी तालुका प्रशासनाने चोख नियोजन करून २० बसेसद्वारे त्यांना नाशिकरोड रेल्वेस्टेशनपर्यंत पोहोचविले. तेथून ते रेल्वेने आपल्या गावी गेले.दिंडोरी तालुका प्रशासनाने प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांनी नियोजन करत तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात असलेल्या स्थलांतरित कामगारांची नोंदणी केली होती.नायब तहसीलदार सूर्यवंशी, तलाठी रोहिणी अळकुटे, सागर बोरस्ते यांनी दिंडोरी येथे नियोजन करत विविध गावांत बसेस पाठविल्या. त्यानुसार गुरु वारी मध्य प्रदेशमधील सुमारे दीडशे कामगारांना रवाना करण्यात आले, तर शनिवारी दुपारी वीस बसेसमधून उत्तर प्रदेशमधील कामगारांना रवाना करण्यात आले. यावेळी कामगारांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेबद्दल राज्य सरकारचे व अधिकाऱ्यांचे आभार मानत कोरोनाचे संकट दूर झाले की पुन्हा येणार असल्याचे सांगत निरोप घेतला.तालुक्यातील दाखल असलेल्या बिहार व पश्चिम बंगालमधील कामगारांना घरवापसीची अद्याप प्रतीक्षा आहे. त्यांच्या राज्यात कधी गाडी जाणार, याबाबत सरकारी कार्यालयात त्यांच्याकडून वारंवार विचारणा होत आहे.अनेक कामगारांनी केला घरी जाण्याचा बेत रद्ददिंडोरी तालुक्यात सुमारे सात हजार परप्रांतीय कामगार आहेत. त्यात अनेकांनी गावोगाव तहसील कार्यालयात गावी जाण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र रेल्वेने जाणारे त्यात अत्यंत कमी आहेत. काही कामगार खासगी वाहनाने गावी गेले आहेत, मात्र आता कंपन्या सुरू झाल्याने तसेच लॉकडाउन शिथिल होत विविध कामे सुरू होण्याच्या अंदाज पाहता बहुतांशी कामगारांनी गावी परतण्याचा निर्णय रद्द केला आहे. नियमित रेल्वेसेवा सुरू होईल तेव्हाच परत जाण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सST Strikeएसटी संप