शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

गिते व बागुल यांच्या शिवसेनेतील घरवापसीने राजकीय वर्तुळ पूर्ण मस्ती सोडून, गळतीची कारणे भाजप शोधणार का ?

By किरण अग्रवाल | Updated: January 10, 2021 01:11 IST

पक्ष सोडून गेलेल्यांकडे दुर्लक्ष करणे कसे महागात पडते हे गेल्यावेळी महापालिकेच्या सत्तेत राहिलेल्या ह्यमनसेह्णने अनुभवले आहे. तीच चूक विद्यमान सत्ताधारी भाजप करणार असेल तर त्यांच्याकडूनच शिवसेनेला ह्यअच्छे दिनह्ण दाखविण्यासाठीचा तो पुढाकार ठरेल.

ठळक मुद्देभाजपच्या होऊ शकणाऱ्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त होणे स्वाभाविक या दोघांनी द्रोह करावा हा भाजपसाठी धक्काच दोघांना गमावल्यावर तरी भाजप सुधारणार आहे का? गळतीच्या कारणांकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे लागेल

सारांशपक्षाच्या बळकटीकरणासाठी म्हणून पक्षांतरे घडून येतात हे खरेच; पण यात पक्षाबरोबरच त्या संबंधित व्यक्तीच्या लाभाचे गणित व त्यांनी सोडलेल्या पक्षाचे नुकसान अधिक महत्त्वाचे असते हे अंतिम सत्य आहे; त्यामुळे नाशकात शिवसेनेत सुरू झालेल्या भरतीच्या परिणामांचा विचार करताना भाजपच्या होऊ शकणाऱ्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त होणे स्वाभाविक ठरावे.

माजी आमदार वसंत गिते व सुनील बागुल या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश करून भाजपला धक्का दिला आहे. हा धक्का वगैरे नसल्याचा आव भाजपकडून आणला जात आहे, पण ते उसने अवसान म्हणायला हवे कारण हा धक्काच आहे. गिते व बागुल हे दोन्हीही स्थानिक पातळीवर प्रभाव राखणारे नेते आहेत म्हणून भाजपत गेल्यावर त्यांना थेट प्रदेशच्या उपाध्यक्षपदी संधी दिली गेली होती, इतकेच नव्हे तर महापालिकेत भाजपच्या पहिल्या अडीचकीच्या टर्ममध्ये गिते यांचे पुत्र प्रथमेश यांना, तर दुसऱ्या टर्ममध्ये बागुल यांच्या मातोश्री श्रीमती भिकूबाई बागुल यांना उपमहापौरपदाची बक्षिसी देण्यात आली. अलीकडेच जुन्या निष्ठावंतांना डावलून भाजयुमोचे शहराध्यक्ष पद त्यांच्या घरात देण्यात आले. असे असताना या दोघांनी द्रोह करावा हा भाजपसाठी धक्काच आहे.

कुणी कितीही लवचीक होण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या मूळ स्वभाव व सवयीत फार बदल घडवून आणता येत नाही. भाजपने भरपूर देण्याचा प्रयत्न केला तरी गिते व बागुल तेथे रमू शकले नाहीत ते त्यामुळेच, कारण आक्रमकता व उत्स्फूर्ततेला तेथे संधीच नव्हती. अर्थात गिते शिवसेनेतून बाहेर पडून मनसेत गेले, तिथे या स्वभाव व सवयीला मोडता घालण्याची वेळ फारशी आली नव्हती; तरी तिथे टिकू शकले नाही व अखेरीस भाजपमार्गे शिवसेनेत परतले. बागुलही व्हाया राष्ट्रवादी व भाजप मार्गे सेनेत परतले त्यामुळे या दोघांचे राजकीय वर्तुळ पूर्ण झाले आहे. याचा फायदा पक्षाला व या दोघा नेत्यांनाही होईलच; पण या दोघांना गमावल्यावर तरी भाजप सुधारणार आहे का?

नाशकात भाजपचे तीन आमदार व महापालिकेत सत्ता असली तरी संघटनात्मकदृष्ट्या या पक्षातील निर्नायकी अवस्था लपून राहिलेली नाही. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भ्रष्टाचाराचे बोल लावलेल्या स्वपक्षाच्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पुन्हा पक्षात घेतले गेले. अर्थात, राजकारणात असे येणे-जाणे चालत असते त्यामुळे त्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. प्रश्न आहे तो इतकाच की, महापालिकेतील सत्तेच्या मस्तीतून बाहेर पडून पक्षाला लागू पाहणाऱ्या गळतीबद्दल गांभीर्याने हा पक्ष व त्याचे नेते विचार करणार आहेत की नाही?

सोडून गेलेले बुडत्या नावेत बसले हे म्हणणे सोपे. तसे म्हणणे परिस्थितीतून उद‌्भवलेल्या अपरिहार्यतेचा भाग असते. पण अशांच्या जाण्याने गळती लागून आपलीच नाव बुडणार नाही ना, याची काळजी कोण घेणार? बाहेरून आलेल्यांच्या पुन्हा बाहेर पडण्याने म्हणजे गळतीने पक्षातील निष्ठावंतांना सुगीचे दिवस येतील हे जरी खरे असले तरी तेवढ्यावर महापालिकेतील सत्ता पुन्हा पुढच्यावेळी राखता येईल का, या प्रश्नाचे उत्तर समाधानकारकपणे देता येणार नसेल तर या गळतीच्या कारणांकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे लागेल, अन्यथा हे राम म्हणण्याची वेळ येणे अटळ समजायला हवे.

शिवसेनेत आता नेतेच झाले अधिक...काँग्रेस व राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचाच पक्ष म्हणून पाहिले जाते, तीच गत आता शिवसेनेची होऊ घातली आहे. राज्यातील सत्तेच्या अनुषंगाने बदललेली गणिते लक्षात घेता या पक्षात इन्कमिंग वाढण्याची चिन्हे आहेत; पण त्यामुळे निष्ठावंतांच्या नाराजीने डोके वर काढू नये म्हणजे झाले. पक्षात नव्याने येणारे काही सतरंज्या उचलायला आलेले नाहीत हे उघड आहे, त्यामुळे त्यांच्या येण्याने पक्षातील काही जणांच्या संधी हिरावल्या जातीलच. त्यादृष्टीने पक्षसंघटनेत वर्चस्व राखणारा एक गट व महापालिकेच्या राजकारणात मिरासदारी मिरवणारा दुसरा गट या दोघांनाही नवीन भरती अडचणीची ठरू शकते. विशेषतः या पक्षातीलही नेत्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्यांचा समतोल सांभाळणे हेच यापुढील काळात संपर्कप्रमुखांपुढील आव्हान ठरलेले दिसले तर आश्चर्य वाटू नये.

टॅग्स :Nashikनाशिक