शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

इशान्येतील शिक्षणासाठी निवृत्त शिक्षकांनीही योगदान द्यावे-जयवंत कोंडविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 19:03 IST

पूर्वांचल भागातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी पूर्वांचल विकास समितीकडून शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता माध्यमातून शाळा सुरू करून सुरुवात केली आहे. या उपक्रमात शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनीही सहभागी होत आपले योगदान देण्याचे आवाहन पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर यांनी केले.

ठळक मुद्देईशान्येतीलजनतेला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरजशिक्षकांसह निवृत्त शिक्षणांनीही योगदाने देण्याचे आवाहन

नाशिक : ईशान्य भारतातील पूर्वांचल भागातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी पूर्वांचल विकास समितीकडून शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता माध्यमातून शाळा सुरू करून सुरुवात केली आहे. या उपक्रमात शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनीही सहभागी होत आपले योगदान देण्याचे आवाहन पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर यांनी केले.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रुंग्टा हायस्कूलचे माजी शिक्षक भय्याजी काणे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.१४) जु. स. रुंग्टा विद्यालयाच्या सभागृहात ‘शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता’ विषयावर ते बोलत होते. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कलाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या जयंती सोहळात व्यासपीठावर जनकल्याण समितीचे अध्यक्ष जयवंत कुलकर्णी, सचिव अश्विनकुमार येवला उपस्थित होते. जयवंत कोंडविलकर यांनी भय्याजी काणे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी पूर्वांचलमध्ये १९७३ मध्ये जाऊन होणारा विरोध झुगारीत नागरिकांचे मन जिंकू न पूर्वांचलमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अशाप्रकारे त्यांनी १९९३पर्यंत शेकडो मुले पूर्वांचलातून महाराष्ट्रात आणून महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबामध्ये त्यांना ठेवून त्यांच्या मनामध्ये भारताबद्दल प्रेम निर्माण केले. त्याच काळात काणे यांनी पूर्वसीमा विकास प्रतिष्ठान संस्थेची स्थापना करतानाच या माध्यमातून पूर्वांचलमध्ये शाळा सुरू केल्या असून, आजही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, त्यांनी ईशान्य भारतातील आठ राज्यांतील भौगोलिक माहिती चलचित्रांच्या साह्याने उपस्थितांसमोर मांडतानाच ईशान्य भारतात सुरू असलेल्या शाळेत शिकविण्यासाठी महाराष्ट्रातून आवड असलेले शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अश्विनकुमार येवला यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले. यशश्री कचरेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकnorth eastईशान्य भारतIndiaभारत