शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सेवानिवृत्त अभियंता ठरविला बेरोजगार अभियंता

By admin | Updated: February 19, 2015 00:10 IST

खाबूगिरी : पती-पत्नीलाही बेरोजगार कोट्यातून ठेके

नाशिक : शासकीय सेवेतून निवृत्त झालेला अभियंता बेरोजगार, तर एका अभियंत्याच्या कुटुंबातील मुलगा आणि सून हेही बेरोजगार. नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात हे चमत्कार घडले आहेत. त्यानिमित्ताने बांधकाम खात्यातील खाबूगिरी चव्हाट्यावर आली असून, शासन त्यावर आता काय कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.विमानतळावर ठेकेदारांकडून मद्यपार्टी झोडपणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता आणि ठेकेदाराची साखळी यानिमित्ताने चांगलीच चर्चेत आली आहे. या साखळीची प्रचिती देणारे अनेक आश्चर्यकारक प्रकारदेखील घडले आहेत. माहितीच्या अधिकारात मनसेने ही यादी मिळवली असून, त्यात अनेक चमत्कार बघायला मिळत आहेत. २०१० ते २०१४ सालापर्यंत म्हणजे तीन वर्षांतच अनेक प्रकार सापडले आहेत. सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून ज्यांना कामे देण्यात आली त्यात अनेक प्रकारचे संशयास्पद ठेकेदार सापडले आहेत. प्रभाकर गो. पाटील या सेवानिवृत्त अभियंत्याला सुशिक्षित बेरोजगार संवर्गात बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्यांना ठेके देताना एकाच रस्त्याच्या दुरुस्तीचे दोन तुकडे पाडण्यात आले. २०१२ मध्ये बेरोजगार अभियंत्यांना केवळ पाच लाख रुपयांपर्यंतचीच कामे देण्यात येत असल्याने ही मखलाशी करण्यात आली आणि वणी-सापुतारा रस्त्याचे एक काम चार लाख १९ हजार ४२४ रुपयांना, तर दुसरे काम चार लाख ९९ हजार ९३० रुपयांना देण्यात आले आणि दोन्ही कामे २० फेब्रुवारी २०१२ रोजीच देण्यात आली आहेत. बांधकाम खात्यातील आढाव नामक एका अभियंत्याच्या मुलगा आणि सुनेला बेरोजगार अभियंता म्हणून कामे देण्यात आली आहेत. दीप्ती श्रे. आढाव यांना २८ फेब्रुवारी २०१३ रोजी जातेगाव रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी नऊ लाख ९९ हजार ७०५ रुपयांचे काम देण्यात आले, तर श्रेयस रा. आढाव यांना १ मार्च २०१३ रोजी अंबई जोडरस्त्याची सुधारणा करणे हे नऊ लाख ९९ हजार २७१ रुपयांचे काम देण्यात आले. एकाच पत्त्यावर राहणारे पती-पत्नी बेरोजगार कसे काय, असा प्रश्न मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोेंबडे यांनी उपस्थित केला आहे. अमोल मोतीराळे हे बेरोजगार अभियंता ठेकेदार बांधकाम खात्यातील अभियंत्याचे चिरंजीव असून, त्यांनाही नऊ लाख ९९ हजार ३६७ रुपयांचे काम देण्यात आले आहे. बांधकाम खात्यातील या कुटुंबकल्याण योजनेची चौकशी करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. या सर्व प्रकारांबाबत मनसेने यादीसह शासन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असून, या सर्व ठेक्यांतील कौटुंबिक तसेच आर्थिक लागेबांध्याची चौकशी करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिली.