शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ बाजारात कांदा ५० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:18 IST

दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असून याचा थेट परिणाम कांद्याच्या भावात झालेला दिसून येत आहे. बाजार समितीत गेल्या महिन्याभरापासून कांद्याची आवक घटत असून, परिणामी कांदा विक्रमी उसळी घेत दिवसेंदिवस भावात वाढ होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देभावात वाढ : सर्वसामान्य नागरिक त्रस्त; आवक घटली

नाशिक : दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असून याचा थेट परिणाम कांद्याच्या भावात झालेला दिसून येत आहे. बाजार समितीत गेल्या महिन्याभरापासून कांद्याची आवक घटत असून, परिणामी कांदा विक्रमी उसळी घेत दिवसेंदिवस भावात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे याचा परिणाम किरकोळ बाजावर होत असून, बाजारात अत्यल्प प्रमाणात कांदा उपलब्ध आहे. ज्या विक्रेत्यांकडे विक्रीसाठी कांदा शिल्लक आहे त्यांनी भावात मोठी वाढ केली आहे.मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनासह चाळींमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याचेही नुकसान झाले. परिणामी कांद्याची आवक घटतच आहे. त्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून, शेतकऱ्यांचा उरलेल्या कांद्याचेही नुकसान होत असल्याने बाजार समितीत कांदा येत नसल्याने कांद्याला भाव मिळत आहे. नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नर बाजार समितीमध्ये दररोज कांद्याचा भाव वाढत असून, याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सगळ्याच बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी पाच हजारांपर्यंत भाव मिळत असल्यामुळे याचा थेट परिणाम किरकोळ विक्रेत्यांवर झाला असून, बाजारात कांदा ५० ते ५५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. परिणामी कांदा खरेदी ग्राहकांना टाळावी लागत आहे.आणखी भाव वाढण्याची शक्यताकाही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, याचा परिणाम भाजीपाल्यासह कांद्यावर झाल्याचे दिसत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याने सुमारे ५ हजारांपर्यंत उसळी घेतल्याने परिणामी किरकोळ बाजारावर याचा परिणाम झाला आहे. दररोज कांद्याचे भाव प्रति क्विंटलमागे ५०० ते १ हजारांपर्यंत वाढत असून, यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडूनच कांदा खरेदी केला जात नसल्यामुळे शिल्लक असलेला कांदा खरेदीसाठीही ग्राहकच येत नसल्याचे विक्रेते सांगत आहे.खाद्य पदार्थांतूनकांद्याचे प्रमाण कमीकांद्याचे भाव वाढल्यामुळे हॉटेलसह अन्य लहान-मोठ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना कांद्याचा वापर कमी केला आहे. त्यामुळे मिसळसह, भेळमध्ये मिळणाºया कांद्याचे प्रमाण कमी झाले असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. काही ठिकाणी विक्रेते कांद्याला सपशेल नकार देत आहेत. वास्तविक कांद्याचा तुटवडा फारसा नसतानाही काही व्यापारी आणि किरकोळ भाजी विक्रेत्यांनी अधिक दराने विक्री सुरु केल्यामुळे कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव वाढले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा