शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

किरकोळ बाजारात कांदा ५० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:18 IST

दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असून याचा थेट परिणाम कांद्याच्या भावात झालेला दिसून येत आहे. बाजार समितीत गेल्या महिन्याभरापासून कांद्याची आवक घटत असून, परिणामी कांदा विक्रमी उसळी घेत दिवसेंदिवस भावात वाढ होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देभावात वाढ : सर्वसामान्य नागरिक त्रस्त; आवक घटली

नाशिक : दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असून याचा थेट परिणाम कांद्याच्या भावात झालेला दिसून येत आहे. बाजार समितीत गेल्या महिन्याभरापासून कांद्याची आवक घटत असून, परिणामी कांदा विक्रमी उसळी घेत दिवसेंदिवस भावात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे याचा परिणाम किरकोळ बाजावर होत असून, बाजारात अत्यल्प प्रमाणात कांदा उपलब्ध आहे. ज्या विक्रेत्यांकडे विक्रीसाठी कांदा शिल्लक आहे त्यांनी भावात मोठी वाढ केली आहे.मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनासह चाळींमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याचेही नुकसान झाले. परिणामी कांद्याची आवक घटतच आहे. त्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून, शेतकऱ्यांचा उरलेल्या कांद्याचेही नुकसान होत असल्याने बाजार समितीत कांदा येत नसल्याने कांद्याला भाव मिळत आहे. नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नर बाजार समितीमध्ये दररोज कांद्याचा भाव वाढत असून, याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सगळ्याच बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी पाच हजारांपर्यंत भाव मिळत असल्यामुळे याचा थेट परिणाम किरकोळ विक्रेत्यांवर झाला असून, बाजारात कांदा ५० ते ५५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. परिणामी कांदा खरेदी ग्राहकांना टाळावी लागत आहे.आणखी भाव वाढण्याची शक्यताकाही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, याचा परिणाम भाजीपाल्यासह कांद्यावर झाल्याचे दिसत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याने सुमारे ५ हजारांपर्यंत उसळी घेतल्याने परिणामी किरकोळ बाजारावर याचा परिणाम झाला आहे. दररोज कांद्याचे भाव प्रति क्विंटलमागे ५०० ते १ हजारांपर्यंत वाढत असून, यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडूनच कांदा खरेदी केला जात नसल्यामुळे शिल्लक असलेला कांदा खरेदीसाठीही ग्राहकच येत नसल्याचे विक्रेते सांगत आहे.खाद्य पदार्थांतूनकांद्याचे प्रमाण कमीकांद्याचे भाव वाढल्यामुळे हॉटेलसह अन्य लहान-मोठ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना कांद्याचा वापर कमी केला आहे. त्यामुळे मिसळसह, भेळमध्ये मिळणाºया कांद्याचे प्रमाण कमी झाले असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. काही ठिकाणी विक्रेते कांद्याला सपशेल नकार देत आहेत. वास्तविक कांद्याचा तुटवडा फारसा नसतानाही काही व्यापारी आणि किरकोळ भाजी विक्रेत्यांनी अधिक दराने विक्री सुरु केल्यामुळे कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव वाढले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा